Santosh Deshmukh Case – आरोपींनी फाशी होत नाही, तोपर्यंत एकही सण साजरा करणार नाही; मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार

Santosh Deshmukh Case – आरोपींनी फाशी होत नाही, तोपर्यंत एकही सण साजरा करणार नाही; मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिने झाले आहेत. मात्र अद्यापही या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. पोलीस अद्यापही त्याचा शोध घेऊ शकले नाही. यातच आज मस्साजोग ग्रामस्थांनी होळी सण साजरा केला नाही. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत गावात एकही सण साजरा न करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. संताष देशमूख यांना क्रूर वागणूक देत त्यांची हत्या करण्यात आली होती. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनतेच्याही संतापाच्या उद्रेक झाला आहे. यातच आज मस्साजोगच्या ग्रामस्थांनी प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात एका व्यक्तीने भाविकांवर लोखंडी रॉडने केला हल्ला, 5 जण जखमी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात एका व्यक्तीने भाविकांवर लोखंडी रॉडने केला हल्ला, 5 जण जखमी
अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरात भाविकांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. येथे एका अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडने भाविकांवर हल्ला केला, त्यात...
Konkan Holi – शारदादेवी मंदिराचा शिमगोत्सव, भास्कर जाधवांनी नाचवली पालखी
Pune News – चालत्या गाडीमधून मित्रालाच दिले फेकून, बीडच्या तरुणांचा पुण्यात प्रताप
रश्मिका मंदानाने हवाच केली, ‘या’ लक्झरी कारमध्ये विमानतळावर दिसली, किंमत ऐकाल तर शॉक व्हाल
Santosh Deshmukh Case – आरोपींनी फाशी होत नाही, तोपर्यंत एकही सण साजरा करणार नाही; मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार
बदलापूरमध्ये होळी खेळण्यासाठी गेलेले चार तरुण उल्हास नदीत बुडाले, परिसरात हळहळ
मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू