Kapalbhati Pranayama – पचनसमस्या दूर होण्यासाठी कपालभाती प्राणायाम आहे खूप महत्त्वाचा!

Kapalbhati Pranayama – पचनसमस्या दूर होण्यासाठी कपालभाती प्राणायाम आहे खूप महत्त्वाचा!

आपल्याकडे योगशास्त्र आणि योग संस्कृती खूप प्राचीन आहे. काहीशे वर्षांपूर्वींची ही साधना आज पाश्चात्यांनीही आजमवलेली आहे. योग म्हणजे शरीर आणि मनाचे संतुलन. योग शब्द संस्कृत भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. योगाचे असे अनेक प्रकार आणि आसन आहेत जे आपले शरीर आणि मनच नव्हे तर आपला आत्मा देखील शुद्ध करतात. योगाचे बरेच भाग आहेत आणि त्यापैकी प्राणायाम देखील योगाचा एक भाग आहे.

प्राणायाम श्वास आणि चेतना यांचे संतुलन किंवा संयोजन असे म्हटले जाऊ शकते. प्राणायामाच्या प्रकारातील कपालभाती प्राणायामाचे फायदे आपण बघुया.

कपालभाती म्हणजे काय?

कपालभाती हे दोन वेगळ्या शब्दांनी बनले आहेत, कपाल आणि भाती. कपाळ म्हणजे डोके किंवा कपाळ आणि भाती म्हणजे तेज किंवा चमक. अशा प्रकारे कपालभाती म्हणजे कपाळावरील तेज ते चांगले आरोग्याचे लक्षण आहे. दुसरा अर्थ असा आहे की मनाला आंतरीक शुद्ध करणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे आणि बुद्धीची चमक वाढवणे म्हणजे कपालभाती. कपालभाती हा प्राणायामाचा एक प्रकार आहे. हा एक श्वास प्राणायाम आहे.

 

कपालभाती केल्याने पोटासह शरीराच्या सर्व अवयवांना सामर्थ्य प्राप्त होते. हा प्राणायाम करताना पोटावर, आपल्याला शक्य तितका ताण द्यावा लागेल.

 

कपालभातीचे फायदे

कपालभाती प्राणायामामुळे आपल्या शरीरातील चयापचय योग्य राहते, ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते. तसेच आपल्या शरीराची अधिक उर्जावान होते. पोटावरील निरुपयोगी चरबी काढून टाकण्यास हा अतिशय उपयुक्त प्राणायाम आहे.

 

कपालभाती प्राणायाम केल्याने आपली श्वसन प्रणाली बळकट होते. शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो. ज्यामुळे अवयवांची कार्यक्षमता देखील वाढते. कपालभाती प्राणायाम केल्याने शरीर निरोगी राहते आणि बुद्धीची शक्ती वाढते.

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली “बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली
राजस्थानच्या जयपुरमध्ये नुकतेच सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी IIFA Awards 2025 मध्ये दिसले. 8 मार्च पासून सुरु झालेला हा पुरस्कार सोहळा 9...
भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीचा छापा, संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवरच काढला राग
महाझुटी सरकारचा स्वप्नदर्शक आणि बोगस अर्थसंकल्प; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
ही लोकशाही नाही तर एक ढोंग आहे, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Maharashtra Budget 2025 : सरकारने निराशा केली, सभगृहात आवाज उठवणार – उत्तम जानकर
ऑनलाईन वेट लॉस प्लान जीवावर बेतला, डाएटच्या अतिरेकामुळे 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प; अंबादास दानवेंची टीका