ही लोकशाही नाही तर एक ढोंग आहे, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर निशाणा

ही लोकशाही नाही तर एक ढोंग आहे, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर निशाणा

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्पा सोमवारी सुरू झाला. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशीच राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग सरकारच्या नियंत्रणात आहे, असा आरोप सिब्बल यांनी संसदेच्या आवारात केला.

तुम्ही लोकशाहीबद्दल बोलता, जर लोकशाही अशीच चालू राहिली आणि निवडणूक आयोग सरकारची बाजू घेत राहिला तर येणारे निकाल तुमच्यासमोर आहेत, असे कबिल सिब्बल पुढे म्हणाले.

सध्या जी मतदान व्यवस्था आहे, लोकांची मतं रद्द होताहेत, लोकांना घारबाहेर पडू देत नाहीत, डुप्लिकेट मतदार कार्ड, जे लोक येथे राहत नाहीत त्यांचे मतदान कार्ड आहे. दोन-दोन खोल्यांमध्ये 50-50 मते बनवण्याची आणि भाजप सदस्यांच्या आधारे 11,000 मते कापण्याची पद्धत चालू राहिली तर तुम्ही ज्याला लोकशाही म्हणता ती लोकशाही नाही तर एक ढोंग आहे, असे सिब्बल यांनी म्हटले.

निवडणुकीवरील शंकांशी संबंधित प्रश्नावर सिब्बल म्हणाले की, आम्ही हे बऱ्याच काळापासून सांगत आहोत. आम्ही आता ईव्हीएमबद्दल बोलत नाही आहोत, यावर स्वतंत्रपणे चर्चा होईल. ज्या पद्धतीने हे निवडणुका घेतात, जमिनीवर काय घडते, ते आम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे पण ऐकणारे कोणी नाही. ना न्यायालय ऐकतंय ना निवडणूक आयोग आणि हे लोकशाहीबद्दल बोलतात, असे सिब्बल म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बुडीत बँकांच्या पाच लाखांहून अधिक ठेवी असलेल्यांवर आता दुहेरी संकट, पाहा काय घडले? बुडीत बँकांच्या पाच लाखांहून अधिक ठेवी असलेल्यांवर आता दुहेरी संकट, पाहा काय घडले?
भारतीय रिझर्व्ह बँकेने न्यु इंडीया सहकारी बँकेवर नुकतेच कडक निर्बंध जाहीर केल्याने ठेवीदार हवालदील झाले आहेत. ठेवीदारांना त्यांच्या कोणत्याही खात्यातून...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर दगडफेक, RSS कडून शक्तीप्रदर्शन करत…
इंग्लंडजवळील उत्तर समुद्रात तेलवाहू जहाज आणि मालवाहू जहाजांमध्ये टक्कर, दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू
यंदा अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का नाही घातलं? अजित पवार यांनी दिले उत्तर
धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घेताना अजित पवार चुकले
Ratnagiri News – भैयाजी जोशी यांच्यावर कारवाई करावी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवेदनाद्वारे मागणी
सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, दिशा नसलेला पोकळ अर्थसंकल्प; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका