टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर दगडफेक, गाड्या व दुकाने जाळली
मध्य प्रदेशमधील महू शहरातील टीम इंडियाच्या विजयानंतर चाहत्यांनी काढलेल्या विजयी रॅलीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यानंतर दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हिंसाचारात दोन दुकानांना व दोन गाड्यांना आग लावण्यात आली. शहरातील जामा मशिदीजवळ हा प्रकार घडला.
रविवारी चॅम्पियन्स ट्रॉ़फीच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाच गडी राखून न्यूझीलंडचा पराभव केला. तब्बल तेरा वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडिया जिंकली आहे. त्यानंतर महू शहरातील काही तरुणांनी विजयी जल्लोष केला व रॅली काढली. या वेळी त्यांनी फटाकेही फोडले. त्या फटाक्यांवरून दोन गटात वाद झाले. त्यानंतर काही लोकं हातात दगड घेऊन आले व त्यांनी रॅली काढणाऱ्या तरुणांवर तुफान दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. या हाणामारीनंतर काही समाजकंटकांनी दोन गाड्या व दोन दुकानेही जाळली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List