रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा ‘शिमगा’, जनआक्रोश समिती गुरुवारी करणार आंदोलन

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा ‘शिमगा’, जनआक्रोश समिती गुरुवारी करणार आंदोलन

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम 14 वर्षांपासून रखडले असून दरवर्षी बोलघेवडे सरकार तारीख पे तारीख देत आहे. खोके सरकारच्या या पापामुळे महामार्गावर मागील 14 वर्षांत झालेल्या 5 हजार अपघातांत 1 हजारहून अधिक प्रवाशांचा बळी गेला आहे. मात्र त्यानंतरही मुर्दाड यंत्रणेला जाग येत नसल्याने चाकरमानी 13 मार्च रोजी महामार्गावर ‘शिमगा’ करणार आहेत. जनआक्रोश समिती माणगाव येथे हे आंदोलन करत लटकलेली कामे लवकर पूर्ण करण्यासाठी गाऱ्हाणे घालणार आहे.

2011 मध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र महामार्गावरील ठिकठिकाणी बायपास, उड्डाणपूल, पूल, मोऱ्यांची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गावर मागील 14 वर्षांत 5 हजार 61 अपघात झाले असून त्यामध्ये 1 हजार 229 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जनतेत रोष असून 13 मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या माध्यमातून महामार्गावरील माणगाव बस स्थानक येथे ‘शिमगा उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. यावेळी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्णत्वास येवो, असे गान्हाणे मांडले जाणार आहे.

महामार्ग कामाची सध्याची स्थिती

पळस्पे ते कासूदरम्यानच्या गोव्याकडील एका मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तर कासू ते इंदापूर मार्गिकेच्या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. महामार्गावरील सर्वात खराब रस्ता याच टप्प्यात आहे. इंदापूर ते वडपाले 25 किलोमीटरपैकी सुमारे 17 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. वडपाले ते भोगाव आणि भोगाव ते कशेडी मार्गातील एका मार्गिकेचे काम झाले आहे. कशेडी ते परशुराम घाट टप्प्यातील परशुराम घाटातील काम शिल्लक आहे. आरवली ते काटे आणि काटे ते वाकेड टप्प्यातील काम रखडलेले आहे. तर वाकेड ते झारापदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. तसेच नागोठणे, रातवड, इंदापूर, माणगाव, काळ नदी, गोद नदी आणि लोणेरे येथील पुलांची बांधकामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सुमारे 25 अरुंद मोऱ्यांची बांधकामे सुरूच झालेली नाहीत.

आंदोलनाला शिवसेनाचा पाठिंबा

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे कोकणातील चाकरमान्यांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. होळी व गणेशोत्सवासाठी गावी जाणारे चाकरमानी दरवर्षी वाहतूककोंडीत अडकतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या माध्यमातून गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बस स्थानक येथे सायंकाळी ५ वाजता ‘शिमगा उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे, अशी माहिती दक्षिण रायगड जिल्हासंपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांनी दिली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी
सध्या सगळीकडे १४ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय...
युजवेंद्र चहलसोबत ‘मिस्ट्री गर्ल’ शेअर केलाय खास व्हिडीओ, व्हिडीओ पोस्ट ती म्हणाली, ‘सांगितलं होतं ना…’
पार्टटाईमच्या नादात गमाविले 11 लाख
शिवसेना अहिल्यानगर शहरप्रमुखपदी किरण काळे
मेट्रो ट्रॅकवर राडा! आंदोलकांना चोप; पोलिसांवर पेट्रोल फेकल्याने तणाव
विदेशात नोकरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर दगडफेक, गाड्या व दुकाने जाळली