जमिनीच्या वादातून दलित कुटुंबावर हल्ला, 7 जखमी

जमिनीच्या वादातून दलित कुटुंबावर हल्ला, 7 जखमी

राजस्थानच्या रामगड भागात 20 ते 25 जणांच्या गटाने एका दलित कुटुंबावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओमध् कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाली आहे. या हल्ल्यात कुटुंबातील सात जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी गोहा गावात हा हल्ला झाला. या गटाने काठ्या आणि धारदार शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. जखमींना सरकारी आणि खासगी रुग्णालयात नेण्यात आले असून यापैकी दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पीडित कुटुंबातील सदस्य मुकेश कुमार जाटव म्हणाले की, जेव्हा गटाने हल्ला केला तेव्हा ते त्यांच्या जमिनीवर मोहरीची कापणी करत होते. ‘ते काठ्या आणि शस्त्रे घेऊन आले आणि आम्हाला मारहाण करू लागले’, अशी माहिती त्यांनी दिली. संबंधित जमीन आमच्या कुटुंबाची असून आपण त्यावर काम करत होतो, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि काही संशयितांना ताब्यात घेतले. ‘जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असून आम्ही एफआयआर दाखल केला आहे आणि काही लोकांना ताब्यात घेतले आहे’, असे उपनिरीक्षक दयाचंद मीणा म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब
राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. कोर्टाने त्यांना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा...
मुंबई तापली… पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय?
‘छावा’च्या यशानंतर कतरिना कैफ महाकुंभमध्ये; सासूसोबत घेतलं साधूंचं दर्शन
Chhaava: 112 वर्षांनंतर बॉलिवूडच्या इतिहासात विक्रम रचणारा ‘छावा’ दुसरा सिनेमा, तर पहिल्या क्रमांकावर कोणता सिनेमा?
‘इतकं सगळं असूनही ती…’ प्राजक्ता माळी अभिनेत्री आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलली
महाशिवरात्रीनिमित्त ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे विशेष भाग
मुंबईतील ‘त्या’ बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन सुपरस्टार्सचे आयुष्य, कुठे आहे हा बंगला?