SambhajiNagar News – ओव्हरलोड ऊसाचा ट्रक उलटला, 6 मजुरांचा मृत्यू; 11 गंभीर जखमी

SambhajiNagar News – ओव्हरलोड ऊसाचा ट्रक उलटला, 6 मजुरांचा मृत्यू; 11 गंभीर जखमी

ओव्हरलोड ऊसाचा ट्रक उलटल्याने भीषण अपघाताची घटना छत्रपती संभाजी नगरमध्ये घडली. या अपघातात सहा मजुरांचा ऊसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी झाले. जखमी मजुरांना छत्रपती संभाजीनगर आणि चाळीसगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर घाटावर ही घटना घडली.

अपघातग्रस्त ट्रक रविवारी मध्यरात्रीच्या सुमरास पिशोरहून कन्नडला चालला होता. या ट्रकवर 17 मजुर बसले होते. ट्रक ओव्हरलोड असल्याने घाटाजवळ येताच उलटला. ट्रक उलटल्याने सर्व मजूर ऊसाच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. यात सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. किसान धरमू राठोड, मनोज नामदेव चव्हाण, कृष्ण मूलचंद राठोड, मिथुन महारु चव्हाण, सतकुड अशी मयत मजुरांची नावे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली “बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली
राजस्थानच्या जयपुरमध्ये नुकतेच सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी IIFA Awards 2025 मध्ये दिसले. 8 मार्च पासून सुरु झालेला हा पुरस्कार सोहळा 9...
भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीचा छापा, संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवरच काढला राग
महाझुटी सरकारचा स्वप्नदर्शक आणि बोगस अर्थसंकल्प; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
ही लोकशाही नाही तर एक ढोंग आहे, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Maharashtra Budget 2025 : सरकारने निराशा केली, सभगृहात आवाज उठवणार – उत्तम जानकर
ऑनलाईन वेट लॉस प्लान जीवावर बेतला, डाएटच्या अतिरेकामुळे 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प; अंबादास दानवेंची टीका