Maharashtra Budget 2025 : सरकारने निराशा केली, सभगृहात आवाज उठवणार – उत्तम जानकर
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं गरजेचं होतं. सगळं महाराष्ट्र आस लावून बसलेला होता, परंतु या सरकारने निराशा केली. त्यावरती उद्या सभागृहात आवाज उठवणार, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर म्हणाले आहेत. अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.
उत्तम जानकर म्हणाले की, “लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची तरतूद करण्यात आली नाही.” ते म्हणाले, वीज, पाणी या सगळ्या गोष्टींमध्ये बोजवारा उडाला आहे. कर्जमाफी दिली असती तर, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List