Chandrapur News शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात

Chandrapur News शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात वरोरा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले. नागपूर चंद्रपूर मार्गावर हे आंदोलन करण्यात आल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या.

डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी, मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत जाहीर केलेली कर्जमाफी द्यावी, पीक विमा तातडीने द्यावा, नाफेडची सोयाबीन खरेदीची मुदत वाढवावी, कापूस खरेदी सुरू ठेवावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. वाहतूक थांबल्यामुळे पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा डुकरे यांनी यावेळी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली “बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली
राजस्थानच्या जयपुरमध्ये नुकतेच सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी IIFA Awards 2025 मध्ये दिसले. 8 मार्च पासून सुरु झालेला हा पुरस्कार सोहळा 9...
भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीचा छापा, संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवरच काढला राग
महाझुटी सरकारचा स्वप्नदर्शक आणि बोगस अर्थसंकल्प; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
ही लोकशाही नाही तर एक ढोंग आहे, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Maharashtra Budget 2025 : सरकारने निराशा केली, सभगृहात आवाज उठवणार – उत्तम जानकर
ऑनलाईन वेट लॉस प्लान जीवावर बेतला, डाएटच्या अतिरेकामुळे 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प; अंबादास दानवेंची टीका