वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची जलसंजीवनी, कास परिसरातील पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची जलसंजीवनी, कास परिसरातील पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि कमी होणारे नैसर्गिक जलस्रोत लक्षात घेता, जावली तालुक्यातील कास पठार परिसरातील वन्यप्राण्यांसाठी सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी सोडण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.

उन्हाळ्यात कास पठार आणि आसपासच्या जंगलातील प्राण्यांसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीने सात ते आठ वर्षांपूर्वी कृत्रिम पाणवठ्यांची स्थापना केली होती. कास पठारच्या कार्यकारी समितीने वन विभागाच्या सहकार्याने दोन महिन्यांपूर्वी या कृत्रिम पाणवठ्यांचे स्वच्छता कार्य पूर्ण केले होते. त्यामुळे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होऊ शकली. आता गेल्या आठवड्यापासून या पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी सोडण्यात येत आहे. वन्यप्राण्यांसाठी जलसंजीवनी ठरणारे हे पाणवठे आगामी उन्हाळ्यात अधिक उपयुक्त ठरतील.

सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहायक उपवनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरसह दुर्गम भागातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. कास पठार, वांजळवाडी, कुसुंबीमुरा, आटाळी, घाटाई फाटा आणि कास तलावाच्या पलीकडील परिसरात 36

वन्यप्राण्यांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यास मदत

■ कास पठार हे ‘युनेस्को’ने घोषित केलेले जागतिक वारसास्थळ आहे. त्यामुळे येथील वन्यप्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पतींचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कृत्रिम पाणवठ्यांमुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होईल.

फुलांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कास परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या ठिकाणी बिबट्यांसह वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात रात्री पाण्यासाठी येत असतात. त्यामुळे कास पठार आणि आसपासच्या परिसरातील वन्यप्राण्यांसाठी आम्ही नियमितपणे पाणी सोडत आहोत. हे पाणी कमी होऊ नयेत, यासाठी आम्ही सातत्याने निगराणी ठेवत आहोत. या यशस्वी प्रयत्नांमुळे कास पठार परिसरातील वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही आणि त्यांना आवश्यक पाणी वेळेवर मिळेल.
राजाराम काशिद, वनपाल, कास पठार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अबू आझमींकडून औरंगजेबचे गुणगाननंतर मुलगा फरहानची गुंडगिरी समोर, थेट बंदूक काढत धमकवले अबू आझमींकडून औरंगजेबचे गुणगाननंतर मुलगा फरहानची गुंडगिरी समोर, थेट बंदूक काढत धमकवले
Samajwadi Party leader Abu Azmi: समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार अबू आझमी...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी
वडील कर्नाटकचे डीजी, स्वत: अभिनेत्री; तरीही केली 15 किलो सोन्याची तस्करीत
नॉनवेज खाण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय…; रुबिना दिलैकने फराह खानला चिकन सोडण्याचा सल्ला का दिला?
अंकिता लोखंडेचं स्वयंपाकघरही इतकं लॅवीश; 2 एसी अन्… बरंच काही; फराह खानही अवाक्
शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, उद्धव ठाकरे यांच्याकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस
फक्त चिमूटभर हिंग आहे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा! वाचा हिंगाचे महत्त्व