Mumbai: मंदिरातील आरतीला विरोधकरणाऱ्यांना जोरदार उत्तर; जब्रेश्वर मंदिरात शिवसेनेकडून महाआरती

Mumbai: मंदिरातील आरतीला विरोधकरणाऱ्यांना जोरदार उत्तर; जब्रेश्वर मंदिरात शिवसेनेकडून महाआरती

मुंबईतील वाळकेश्वर येथील जब्रेश्वर महादेव मंदिरातील आरतीवर काही स्थानिकांनी आक्षेप घेत त्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. आरती बंद करण्याची मागणी केली. या विरोधात जब्रेश्वर महादेव मंदिरातील भाविकांनी आवाज उठवला आहे. याच दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जब्रेश्वर महादेव मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्याप्रमाणात भाविक उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार जब्रेश्वर महादेव मंदिरात दर सोमवारी होणाऱ्या आरतीला स्थानिक हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत. या आरतीसाठी मुंबई-ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. मात्र काही स्थानिक लोक मंदिराला, हिंदूंना त्रास देत आहेत असं पाहायला मिळत आहे.

मुंबईतील वाळकेश्वर बाणगंगा परिसराजवळच जबरेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास म्हणजे 1840 मध्ये स्थापना करण्यात आलं. या मंदिरात दर सोमवारी रात्री 9 ते 9.30 या वेळेत म्हणजे अर्धा तास आरती करण्यात येते. या आरतीवेळी नगारा व शंख ध्वनी करण्यात येतो. यावर काही स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच आरतीसाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या येणाऱ्या गाड्यांवर देखील स्थानिक हाऊसिंग सोसायट्यांमधील काही रहिवाशांनी आक्षेप घेतला होता. पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून तक्रारी गेल्या होत्या. हा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.

दरम्यान, सोमवारी शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्या वतीने वाळकेश्वर येथील श्री जब्रेश्वर महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी शिवभक्तांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राची परिस्थिती पाहता हे संपूर्ण सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी परिस्थिती आली आहे, असं...
विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल ठेवताच, वाल्मिक कराडने कुणाला केला पहिला फोन; सुप्रिया सुळे यांचा तो हादरवणारा आरोप
MP Sanjay Raut News : ही क्रूरता औरंगजेबाचीच; संतोष देशमुख प्रकरणावरून राऊतांचे खडेबोल
शक्ती कपूरवर आली मुंबईतील घर विकण्याची वेळ, काय आहे नेमकं कारण?
‘तारक मेहता..’मधील अय्यर खऱ्या आयुष्यात आजही सिंगल; लग्नाबद्दल म्हणाला..
31 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने मोडली शपथ! अक्षयने स्पर्श करताच जोडले हात, व्हिडीओ व्हायरल
“गर्भपात नाही केला तर..”; वन नाईट स्टँडनंतर प्रेग्नंट राहिलेल्या अभिनेत्रीचा खुलासा