महाड ट्रॉमा सेंटर, ग्रामीण रुग्णालय ‘सलाईन’वर; रुग्णांचे हाल, आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन हवेतच

महाड ट्रॉमा सेंटर, ग्रामीण रुग्णालय ‘सलाईन’वर; रुग्णांचे हाल, आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन हवेतच

महाड ट्रॉमा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयासाठी आरोग्य विभागाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नऊ पदे मंजूर केली असली तरी प्रत्यक्षात या ठिकाणी केवळ तीनच जण काम करीत आहेत. तब्बल सात पदे रिक्त असल्याने ट्रॉमा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय सलाईनवर आले आहे. पुरेसे कर्मचारी आणि डॉक्टर्स नसल्याने परिसरातील गोरगरीब रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यांना उपचारासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे आठ दिवसांत रिक्त पदे भरून डॉक्टरांची नेमणूक करण्याचे आरोग्य मंत्र्यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे.

तीन महिन्यांपूर्वी वीर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात चौघा जखमींना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. याविरोधात रुग्णालयातील असुविधेच्या विरोधात महाडवासीयांनी प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढून आरोग्य सेवेचा निषेध केला होता. याची गंभीर दखल घेत आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांनी बैठक घेऊन आठ दिवसांत महाड ट्रॉमा सेंटर व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र याला तीन महिने उलटून गेले तरी एकाही डॉक्टरची नेमणूक करण्यात आलेली नाही. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाच पदांपैकी केवळ अस्थिरोगतज्ज्ञ नियुक्त आहे, तर इतर चार पदे रिक्त आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालयातील तीन पदांपैकी एक पद रिक्त आहे.

टँकरने पाणीपुरवठा

मागील आठ दिवसांपासून महाडला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी व कोथुर्डे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. याचा फटका ग्रामीण रुग्णालयाला बसत आहे. यामुळे नगरपालिकेला रोज किमान दोन टँकरची व्यवस्था करावी लागते. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोणत्याही सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत असून हे सेंटर ‘कोमात’ गेले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा