अभी तो मै जवान हूँ! 60 व्या वर्षी भाजप नेता चढणार बोहल्यावर

अभी तो मै जवान हूँ! 60 व्या वर्षी भाजप नेता चढणार बोहल्यावर

पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे सध्या राजकारण व्यतिरिक्त एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. दिलीप घोष लग्न बंधनात अडकणार आहेत. घोष वयाच्या 60 व्या वर्षी पहिल्यांदाच बोहल्यावर चढणार आहेत. कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी रिंकी मजुमदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत.

दिलीप घोष यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. यानंतर 41 वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या सांगण्यावरून लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्न सोहळ्यासाठी फक्त दिलीप घोष आणि रिंकी यांचे कुटुंबीय उपस्थित असतील.

कोण आहेत रिंकी मजूमदार

दिलीप घोष यांच्यासारख्याच रिंकी देखील राजकारणात सक्रिय आहेत. रिंकी या भाजपच्या महिला मोर्चा आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत. रिंकी यांचे वय 50 वर्ष असून त्या घटस्फोटीत आहे. रिंकी यांना एक मुलगा (25) असून तो आयटी क्षेत्रात काम करतो. घोष आणि रिंकी मजूमदार हे एकाच पक्षात असून एकाच परिसरात राहतात.

दिलीप घोष भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना एका कार्यक्रमादरम्यान त्यांची रिंकी मजुमदारशी भेट झाली. दिलीप घोष यांच्या सांगण्यावरून रिंकी मजुमदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2021मध्ये रिंकी यांची दिलीप घोषशी मैत्री झाली आणि नंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दिलीप घोष खूप निराश होते, तेव्हा रिंकी मजुमदार यांनी दिलीप घोष यांना लग्नाचा प्रस्ताव दिला.

रिंकी मजुमदार यांना दिलीप यांच्यासोबत लग्न करून संसार सुरू करायचा होता. मात्र त्यावेळी दिलीप घोष यांनी लग्नासाठी नकार दिला होता. परंतु नंतर त्यांच्या आईच्या आग्रहास्तव दिलीप घोष यांनी लग्न करण्यास होकार दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा