ED, CBIच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, रमेश चेन्नीथला यांनी भाजपला ठणकावलं

ED, CBIच्या  कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, रमेश चेन्नीथला यांनी भाजपला ठणकावलं

ईडी, सीबीआयच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, असं म्हणत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

रमेश चेन्नीथला म्हणाले आहेत की, “केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. मोदी-शहा अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत आणि अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही उलट मजबूतपणे या हुकुमशाहीचा मुकाबला करू.”

रमेश चेन्नीथला म्हणाले की, “मोदी सरकारने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. जनतेत या कारवाईबद्दल तीव्र रोष आहे. काँग्रेस पक्षाने या दडपशाही विरोधात काल व आज दोन दिवस देशभर आंदोलन केले, महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध केला. मोदी शाह यांच्या सरकार विरोधात यापुढेही काँग्रेस पक्ष मजबूतीने लढा देईल.”

दरम्यान, मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ईडीच्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील इंडिया बुल्स जवळ आंदोलन केले. या आंदोलनात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाही तर… संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट काय? महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाही तर… संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट काय?
महाराष्ट्र आणि मराठीला हिंदीपासून धोका नाही तर गुजरातीपासून धोका असल्याचा मोठा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. संघाचे नेते भैय्याजी...
जैन मंदिरावरील कारवाईविरोधात मोठं आंदोलन, मागण्या काय?; मंगलप्रभात लोढा आणि अळवणीही रॅलीत
घटस्फोटानंतर लेकीकडे वळूनही…, पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप, अभिनेता म्हणाला…
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची मुलगी होती ‘ही’ अभिनेत्री, एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं आयुष्य
‘फुले’वरून ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त विधान, अनुराग कश्यपनं मागितली जाहीर माफी; म्हणाला…
“आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी वानखेडेबाहेर उभा राहायचो अन् आता…”, रोहित शर्मा भावूक
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला सोने खरेदीचा फायदा होणार…वर्षभरात दिला जबरदस्त परतावा