‘उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येणार तेव्हा कोंबडी..’, नारायण राणेंनी हॉटेल चालकांना काय सांगितलं?

‘उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येणार तेव्हा कोंबडी..’, नारायण राणेंनी हॉटेल चालकांना काय सांगितलं?

भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवू नका असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे? 

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवा, असं आपण हॉटेल व्यवसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिले? केवळ मासे, मटण खाण्यासाठीच ते कोकणात यायचे, त्यामुळेच ते उद्धव ठाकरे आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवायचे नाहीत, असं मी हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी चिपी विमानतळावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. चिपीला आता इंडिगो विमान पण येणार आहेत, आता चिपी विमानतळ बंद होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. लोकांनी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढावेत यासाठी माझा प्रयत्न असल्याचंही  खासदार नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दिशा सालियन प्रकरणात देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या प्रकरणात मला उद्धव ठाकरे यांचे दोन फोन आल्याचा दावा राणे यांनी केला होता, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून राणेंचा हा दावा फेटाळून लावण्यात आला होता. राणेंना जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरेंना फोन आला होता, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. आता पुन्हा एकदा राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Puratawn चित्रपटाची देशभरात चर्चा, सर्वांनी चित्रपट पाहाण्याचे इंद्रनील सेनगुप्ता यांचं आवाहन! Puratawn चित्रपटाची देशभरात चर्चा, सर्वांनी चित्रपट पाहाण्याचे इंद्रनील सेनगुप्ता यांचं आवाहन!
Puratawn Film Release : सध्या Puratawn या बंगाली सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात कधीकाळी बॉलिवूड गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला...
शर्मिला टागोर यांच्या ‘पुरातन’ चित्रपटाचा प्रीमीयर, बंगाली म्हणून अभिमानाचा क्षण,अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची प्रतिक्रीया
‘मी आज खूप आनंदी, हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल’; Puratawn बद्दल काय म्हणाल्या रितुपर्णा सेनगुप्ता?
सूरज चव्हाणला चित्रपटातील रोल झेपेल का? मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
पूर्व द्रुतगती महामार्गावर कचरा वाहून नेणारा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू; दोन जखमी
प्रेमप्रकरणाच्या संशयातून जोडप्यातील भांडण टोकाला गेले, संतापलेल्या पतीने 9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवले
गुन्हेगारीचा प्रवास दाऊद इब्राहिमपासून आता बीडला पोहोचला, म्हणजे राजकारणापर्यंत पोहोचलेला आहे; संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला