राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर, तरीही विखेंच्या साखर कारखान्याला 296 कोटीचं कर्ज मंजूर

राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर, तरीही विखेंच्या साखर कारखान्याला 296 कोटीचं कर्ज मंजूर

एकीकडे राज्य सरकारवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. आणि दुसरीकडे राज्य सरकारने भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना 436 कोटी रुपायांचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जामुळे राज्य सरकारच्या कर्जात आणखी वाढ झाली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय सहकारी विकास परिषदेकडून राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना 436 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. यातील एक कारखाना राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसरा कारखाना हा रश्मी बागल यांचा आहे. राज्यावर आधीच 9.3 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना हे कर्ज मंजूर झाल्याने राज्यातील कर्जात वाढ झाली आहे. राष्ट्रीय सहकारी विकास परिषदेने दिलेल्या कर्जाला राज्य सरकारने हमी दिली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्याला 296 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर सोलापूरच्या मकई सहकारी साखर कारखान्याला 140 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. मकई साखर कारखाना हा भाजप नेत्या रश्मी बागल यांच्यांशी संबंधित आहे. रश्मी बागल यांचे वडिल दिगंबर बागल हे माजी मंत्री आहेत. यासोबतच राज्य सरकारने लातूरच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याला 18 कोटी रुपयांचे भांडवल वाढवून दिले आहे. हा कारखाना भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचा आहे.

एकीकडे राज्य सरकारने साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. दुसरीकडे राज्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. तसेच या वर्षी राज्यावर 45 हजार 891 कोटी रुपयांची महसुली तूट निर्माण झाली आहे.

राज्यावर आर्थिक ताण कमी व्हावा म्हणून महायुती सरकारने दिलेली वचनं पुढे ढकलली आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी देण्यास नकार दिला आहे. तसेच लाडकी बहीणचे वाढीव 2100 रुपये देण्यासही नकार दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चाळीशीत अप्सरा दिसाल, नवरा पुन्हा प्रेमात पडेल, फक्त आठवड्यातून 3 दिवस नारळ पाणी प्या चाळीशीत अप्सरा दिसाल, नवरा पुन्हा प्रेमात पडेल, फक्त आठवड्यातून 3 दिवस नारळ पाणी प्या
उन्हात नारळ पाणी पिण्याची मजा काही औरच असते, पण तुम्हाला माहित आहे का की, हे फक्त तहान भागवण्यासाठी आणि ताजेपणा...
MERC चा ग्राहकांना शॉक, वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती
IPL 2025 – जॉस बटलरची झुंजार अर्धशतकीय खेळी, गुजरातने RCB चा केला 8 विकेटने पराभव
मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते, त्यांच्या सैन्यात मुस्लीमही होते, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Mumbai Local – कुर्ला स्टेशनवर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून धूर, प्रवाशांची धावाधाव
लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी दिल्लीला रवाना