एलआयसी आता आरोग्य विमा क्षेत्रात उतरणार; 31 मार्चपर्यंत होणार घोषणा, कंपनीचे नावही जाहीर करणार

एलआयसी आता आरोग्य विमा क्षेत्रात उतरणार; 31 मार्चपर्यंत होणार घोषणा, कंपनीचे नावही जाहीर करणार

देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी ‘एलआयसी’ लवकरच आरोग्य विमा क्षेत्रात उतरणार आहे. त्यासाठी एलआयसी एका स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीत भागीदारी खरेदी करणार आहे. याबाबतची घोषणा चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस होईल, असे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले. मात्र एलआयसी नेमकी कोणत्या आरोग्य विमा कंपनीशी भागीदारी करणार आहे, त्या कंपनीचे नाव सिद्धार्थ मोहंती यांनी उघड केले नाही.

मुंबईत गुंतवणूक तज्ञांच्या जागतिक परिषदेला संबोधित करताना  सिद्धार्थ मोहंती म्हणाले, आरोग्य विमा कंपनीसंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यावर आहे. आरोग्य विमा क्षेत्रात उतरणे ही एलआयसीसाठी ‘नॅचरल चॉइस’ आहे. या प्रक्रियेच्या मंजुरीला वेळ लागतोय. पण मला आशा आहे की, या वर्षी 31 मार्चच्या आत याबाबत निर्णय होईल. ज्या आरोग्य विमा कंपनीचा एलआयसी विचार करत आहे, त्या कंपनीत एलआयसीची जास्त भागीदारी नसेल.

चालू आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीतच एलआयसीने आरोग्य विमा क्षेत्रात पाऊल टाकण्याचे सूतोवाच दिले होते. आता आर्थिक वर्षाच्या अखेरीस एलआयसीची वाटचाल त्या दिशेने होण्याचे संकेत आहेत.

तसे पाहिले तर सध्या सात स्वतंत्र आरोग्य विमा पंपन्या आहेत. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स, कार हेल्थ इन्शुरन्स, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स, नारायण हेल्थ इन्शुरन्स आणि गॅलेक्सी हेल्थ इन्शुरन्स. त्यापैकी एका कंपनीत एलआयसी भागीदारी करणार आहे. ती कंपनी कोणती ते लवकरच समजेल.

एलआयसी आता आरबीआयसोबत 50 आणि 100 वर्षांचे बॉण्ड आणण्याच्या तयारीत आहे. सध्या देशात 20, 30, 40 वर्षांचे बॉण्ड उपलब्ध आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन? ‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन?
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हातील खुलताबाद येथे आहे. आता औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको, त्याची कबर हटवण्याची मागणी होत आहे. दरम्यान,...
ब्युटी विथ ब्रेन! कोण आहे पंकज त्रिपाठी यांची मुलगी? जी वयाच्या फक्त 18 व्या वर्षी करतेय अभिनयात पदार्पण
अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांचं चांगले संबंध नव्हते… अनेक वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने सोडलं मौन
होळीत नको तिथे रंग लावल्यामुळे चर्चेत आलेली आमिर अलीची गर्लफ्रेंड कोण? जाणून घ्या
मुस्लीम असून रमजानमध्ये दारू..; रझा मुराद यांच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी
हार्दिक पांड्याला नवीन प्रेम सापडल्याने नताशा अस्वस्थ? प्रेम,विश्वासावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत
75 वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अजब मागणी, नकार देत म्हणाली, ‘मी पूर्ण थंड पडली कारण…’