एक रुपयात पीकविमा योजना सरकारने गुंडाळली, आता नवीन योजनेची तयारी

एक रुपयात पीकविमा योजना सरकारने गुंडाळली, आता नवीन योजनेची तयारी

दोन वर्षांपूर्वी महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत एक रुपयातं पीक विमा योजना आणली होती. या योजनेत अनेक गैरव्यवहार झाले म्हणून सरकारला ही विमा योजना आता मागे घ्यावी लागली आहे. मे महिन्यात खरीप हंगाम सुरू होणार आहे, त्यापूर्वी सरकार नवीन योजना आणणार आहे.

हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज फेडायचे आवाहन केले होते. तसेच सध्या कुठलीही कर्जमाफी होणार नाही असे जाहीर केले होते. सरकारने केलेल्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवू नका आणि कर्ज फेडून टाका असेही अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर पीक विमा योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आर्थिक वर्षात राज्याची महसूली तूट ही 1.33 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. ही योजना बंद झाल्याने यामुळे सरकारचे 7 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. राज्याच्या कृषी विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक सादरीकरण दिले होते. त्यानंतर ही योजना मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेत अनेक गैरव्यवहार झाल्याचे आणि बोगस दावे केल्याचे समोर आले होते.

राज्यात 1.70 लाख नोंदणीकृत शेतकरी आहेत आणि एक रुपया पीकविमा योजनेतून एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला होता. पूर्वी राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जायची. या योजनेच्या तिप्पट अर्जदारांनी एक रुपयात पीक विमा योजनेत अर्ज केला होता. पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना विम्याच्या एकूण प्रीमियरपैकी 2 ते 5 टक्के प्रिमियम भरावा लागायचा आणि उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरायचे. एक रुपया पीक विमा योजनेत विम्याच्या प्रिमियमचा एक भाग राज्य सरकार भरायचे तर एक भाग केंद्र सरकार भरायचे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्य सरकार साडे तीन हजार कोटींचा प्रिमीय भरायचे. एक रुपयात पीक विमा योजनेत राज्य सरकारवर सात हजार कोटी रुपयांचा भार आला आणि राज्य सरकारला एकूण 10 हजार 500 कोटी रुपयांचा प्रिमीयम भरावा लागत होता. हजारो कोटी रुपयांचा प्रिमियम भरून शेतकऱ्यांना या योजनेत फार कमी नुकसान भरपाई मिळत होती अशी माहिती कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

या योजनेत तब्बल साडे चार लाख बोगस अर्ज सापडले. या अर्जदारांनी योजनेच्या पैश्यांसाठी सरकारी जमीनीवर, सार्वजनिक जमीनीवर, मंदिरांच्या जमीनीवर इतकंच नाही तर धरणात पीक लावल्याचे दाखवले होते. अनेक अर्जांमध्ये एकच सेवाकेंद्र असल्याचे समोर आले. अनेक अर्ज ज्या शेतकऱ्यांच्या नावे होते ते अर्ज त्या शेतकऱ्यांचा माहितीशिवाय भरण्यात आले होते. एका अर्जामागे या केंद्रांना 40 रुपये मिळत होते. कृषी विभागाला साडे चार लाख पेक्षा बोगस अर्ज मिळाल्याने राज्य सरकारने 96 केंद्र बंद केली. त्यामुळे प्रिमीयमचे 80 कोटी रुपये वाचल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण सारख्या अनेक योजना आणल्या होत्या. पण या योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण आला होता. राज्य सरकारच्या तिजोरीवरील हा ताण कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुरू आहेत. राज्य सरकारने अनेक योजनांना कात्री लावायला सुरुवात केली आहे. एक रुपयातं पीक विमा योजने ऐवजी ठिबक सिंचन योजना, शेत तळे सारख्या योजनांवर निधी दिला जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल
माजी आरोग्य मंत्री आणि कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांना कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं पी. एच. डी. प्रदान...
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते, त्यांच्या सैन्यात मुस्लीमही होते, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Mumbai Local – कुर्ला स्टेशनवर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून धूर, प्रवाशांची धावाधाव
लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी दिल्लीला रवाना
मध्य प्रदेशमध्ये दोन महिला माओवाद्यांचा खात्मा, दोघींच्या डोक्यावर होते प्रत्येकी 14 लाखांचे बक्षिस
IPL 2025 – राजस्थान विजयी ट्रॅकवर परतणार? दमदार यष्टीरक्षकाचं होणार पुनरागमन
BSNL ने 1,757 कोटी रुपयांवर पाणी सोडलं? कॅगच्या अहवालातून मोठा घोळ उघड