खास लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहच्या मालिकेत परत येतेय प्रेक्षकांची आवडती नायिका

खास लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहच्या मालिकेत परत येतेय प्रेक्षकांची आवडती नायिका

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सुपरहिट मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधून घराघरात पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या नव्याकोऱ्या मालिकेतून अभिनेत्री गिरीजा प्रभू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. कावेरी सावंत असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी ही व्यक्तिरेखा आहे.

‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिकेतील कावेरी ही भूमिका साकारण्यासाठी गिरीजा प्रचंड उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना ती म्हणाली, “स्टार प्रवाह माझी लाडकी वाहिनी आहे. पुन्हा एकदा नवं पात्र साकारायची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे आभार. कावेरी ही भूमिका खूप वेगळी आहे. मालिकेची गोष्ट कोकणात घडते त्यामुळे कोकणी भाषा शिकतेय. मालिकेच्या प्रोमोमध्ये छोटीशी झलक पाहायला मिळेलच. मालिकेत माझ्या वडिलांची भूमिका वैभव मांगले साकारत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मी कोकणी भाषेचे धडे गिरवत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

“कावेरीचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमी झटत असते. बाप-लेकीच्या नात्याचा घट्ट बंध या मालिकेत पाहायला मिळेल. गौरी आणि नित्या या दोन्ही व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे तेच प्रेम कावेरीलाही मिळेल अशी खात्री आहे,” असं ती पुढे म्हणाली.

स्टार प्रवाहने नुकतीच ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेची घोषणा केली. त्याचा दमदार प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पहायला मिळतं की, कावेरीचे वडील, बहीण आणि भावोजी तिला शोधत असतात. कावेरी माडावर चढून नारळ काढत असते. तेवढ्यात तिचे वडील तिला तिच्या बहिणीला तिच्या सासूने परत सासरी बोलावल्याचं सांगतात. हे ऐकून कावेरी खुश होते आणि हे सगळं बहिणीच्या लहान मुलामुळे शक्य झाल्याचं म्हणते. पण त्याचसोबत लाडका भाचा दुरावणार म्हणून ती निराशसुद्धा होते. तेव्हा तिची बहीण तिला तिच्यासोबत मुंबईला यायला सांगते. “तू माझ्या बाळाची दुसरी आईच आहेस”, असं ती म्हणते. या मालिकेत गिरीजा प्रभू, वैभव मांगले, अमित खेडेकर आणि अमृता माळवदकर यांच्या भूमिका आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन? ‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन?
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हातील खुलताबाद येथे आहे. आता औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको, त्याची कबर हटवण्याची मागणी होत आहे. दरम्यान,...
ब्युटी विथ ब्रेन! कोण आहे पंकज त्रिपाठी यांची मुलगी? जी वयाच्या फक्त 18 व्या वर्षी करतेय अभिनयात पदार्पण
अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांचं चांगले संबंध नव्हते… अनेक वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने सोडलं मौन
होळीत नको तिथे रंग लावल्यामुळे चर्चेत आलेली आमिर अलीची गर्लफ्रेंड कोण? जाणून घ्या
मुस्लीम असून रमजानमध्ये दारू..; रझा मुराद यांच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी
हार्दिक पांड्याला नवीन प्रेम सापडल्याने नताशा अस्वस्थ? प्रेम,विश्वासावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत
75 वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अजब मागणी, नकार देत म्हणाली, ‘मी पूर्ण थंड पडली कारण…’