आता नो लेट मार्क, बदलापूर – कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या विस्ताराला मंजूरी

आता नो लेट मार्क, बदलापूर – कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या विस्ताराला मंजूरी

पंतप्रधान गती शक्ती नॅशनल मास्टर प्लान अंतर्गत बदलापूर – कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या विस्ताराला शुक्रवारी नेटवर्क प्लानिंग ग्रुपच्या ( NPG ) ८९ व्या प्लानिंग ग्रुप अंतर्गत मंजूरी दिली आहे. प्रवासी आणि मालवाहतूकीसाठी ३२.४६० किमीच्या मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई कॉरीडॉर या ब्राऊन फिल्ड प्रोजेक्टला मंजूरी देण्यात आली आहे. या प्रोजेक्टला मंजरी मिळाल्याने बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपूरी आणि कर्जत या शहरांना फायदा होणार आहे.

१४ किलोमीटर लांबीचा कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिकेचे काम एमयूटीपी फेज-३ अ अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ करीत आहे. या प्रकल्पाचा खर्च १,५१० कोटी रुपये आहे. या योजनेचा खर्च रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार ५०:५० टक्के विभागून करणार आहेत.

कल्याण आणि कर्जतमधील सध्याच्या दोन मार्गिकेवरुन मेल – एक्सप्रेस आणि मालगाडी ट्रेन आणि उपनगरीय लोकल अशा विविध स्वरुपाची संमिश्र वाहतूक सुरु असते. बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या सॅटेलाईट सिटीतून प्रवाशांना कल्याण आणि मुंबईला जाण्यासाठी योग्य उपनगरीय रेल्वे कनेक्टीव्हीटीची आवश्यकता आहे. सध्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोली येथे लोकल टर्मिनेट करुन चालविल्या जातात.

लोकलच्या फेऱ्या वाढविता येतील

सध्या कल्याण-बदलापूर विभागात अतिरिक्त मार्गिका नसल्याने लोकलच्या फेऱ्या वाढवता येत नाहीत. कल्याण ते बदलापूर या नवीन उपनगरीय कॉरिडॉरमुळे उपनगरीय रेल्वे फेऱ्या वाढविता येतील आणि या शहरांना अत्यंत आवश्यक असलेली उपनगरीय रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल,” असे एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन… डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन…
आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष...
शरद पवार गटात पुन्हा राजकीय भूकंप?, जयंत पाटील असं काय बोलले हसन मुश्रीफांकडे? मुश्रीफांचा दावा काय?
550 कोटींची मालक फोटोतील ही लहान मुलगी, एका चित्रपटासाठी घेते 15 कोटी, परिवारात अनेक सुपरस्टार्स
बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त ‘या’ छोट्या गोष्टींची घ्या काळजी
तुम्हाला कलिंगड खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का? चला जाणून घेऊया तज्ञांचे मत…
महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन
Ratnagiri News – आगामी काळात शिवसेनेचे अस्तित्व दाखवूनच देऊ, अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला विश्वास