अर्थसंकल्पापेक्षा पुरवणी मागण्या अधिक, महायुती सरकारच्या काळात खर्च वाढला; पुरवणी मागण्यांचे प्रमाण 16 टक्क्यांनी वाढले

अर्थसंकल्पापेक्षा पुरवणी मागण्या अधिक, महायुती सरकारच्या काळात खर्च वाढला; पुरवणी मागण्यांचे प्रमाण 16 टक्क्यांनी वाढले

महायुती सरकारच्या काळात वाढलेला खर्च आणि वाढीव खर्चाचा अंदाज न आल्यामुळे या सरकारच्या काळात पुरवणी मागण्यांचे प्रमाण 16 टक्क्यांवर गेल्याचे ‘समर्थन’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात नमूद केले आहे. मूळ मागणीत पुरवणी मागण्यांचे प्रमाण 5 ते 10 टक्के ठेवण्याची शिफारस आहे. पण तरीही महायुती सरकारने पुरवणी मागण्यांचे प्रमाण वाढवत नेल्याचे अहवालात नमूद केले आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘समर्थन’ने सरकारच्या खर्चाच्या पूरक विवरणपत्राचे विश्लेषण केले आहे. त्यामध्ये सर्व तपशील नमूद केला आहे. सर्वाधिक मागण्या ग्रामविकास विभागाच्या पुरवणी मागण्या केलेल्या 29 विभागांपैकी दोन विभागांनी सर्वात मोठय़ा पुरवणी मागण्या केल्या आहेत. सर्वात जास्त मागण्या ग्रामविकास विभागाने म्हणजे 3 हजार 6 कोटी ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने 1 हजार 688 कोटी 74 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या केल्या आहेत.

समितीची शिफारस काय आहे

या पुरवणी मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारने गोडबोले समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार पुरवणी मागण्यांचे प्रमाण विभागनिहाय 5 ते 10 टक्केच ठेवावे अशी शिफारस आहे, पण सरकार हा नियम पाळत नसल्याचे ‘समर्थन’च्या अहवालात नमूद केले आहे.

पुरवणी मागण्या कधी करता येतात

अर्थसंकल्पीय अंदाज करताना ज्याचा अंदाज करता आली नाही अशा कारणांमुळे खर्चासाठी नव्याने किंवा वाढीव तरतूद करायची झाल्यास अकल्पित व तातडीचा खर्च भागवण्यासाठी आकस्मिकता निधीतून घेतलेल्या आगाऊ रकमेची भरपाई करायाची झाल्यास शासनाने मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत 5 ते 10 टक्क्यांपेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या करू नयेत असा दंडक आहे.

– 2019-2022 या कालावधीत महाविकास आघाडीचे सरकार होते. या कालावधीत मूळ मागणीच्या तुलनेत पुरवणी मागण्यांचे प्रमाण 13 टक्के होते. मात्र 2022-24 या कालावधीत महायुती सरकार आल्यावर मूळ मागण्यांच्या तुलनेत पुरवणी मागण्याचे प्रमाण 16 टक्क्यांवर गेल्याचे दिसून येते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी
सध्या सगळीकडे १४ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय...
युजवेंद्र चहलसोबत ‘मिस्ट्री गर्ल’ शेअर केलाय खास व्हिडीओ, व्हिडीओ पोस्ट ती म्हणाली, ‘सांगितलं होतं ना…’
पार्टटाईमच्या नादात गमाविले 11 लाख
शिवसेना अहिल्यानगर शहरप्रमुखपदी किरण काळे
मेट्रो ट्रॅकवर राडा! आंदोलकांना चोप; पोलिसांवर पेट्रोल फेकल्याने तणाव
विदेशात नोकरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर दगडफेक, गाड्या व दुकाने जाळली