मानपाडावासीयांनी रोखले ठाणे-बोरिवली बोगद्याचे काम; निसर्गाने नटलेल्या भागाचे वाळवंट, धूळधाणीमुळे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले

मानपाडावासीयांनी रोखले ठाणे-बोरिवली बोगद्याचे काम; निसर्गाने नटलेल्या भागाचे वाळवंट, धूळधाणीमुळे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले

ठाणे-बोरिवली या भुयारी मार्गाच्या कामामुळे मानपाडा परिसराची धूळधाण उडाली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या भागाला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त झाले असून परिसरात श्वसनाच्या विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ध्वनिप्रदूषण आणि वाहतूककोंडीमुळे हैराण झालेल्या मानपाडावासीयांच्या संतापाचा भडका आज अखेर उडाला. या प्रकल्पाविरोधात शेकडो नागरिकांनी रस्ता रोको करून काम बंद पाडले. त्यामुळे एमएमआरडीए प्रशासन आणि पोलिसांची एकच तारांबळ उडाली. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने सर्व परिसर दणाणून गेला.

ठाणे आणि बोरिवली दरम्यानचे अंतर 15 मिनिटांवर आणण्यासाठी एमएमआरडीएकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे. हा मार्ग बोगद्यातून जात असला तरी एमएमआरडीएने या मार्गासाठी या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली आहे. जुने वृक्ष रातोरात हटवले आहेत. त्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मानपाडालगत असलेला मुल्लाबाग हा परिसर निसर्गसौंदयनि नटलेला आहे. एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठी जुनी झाडे आहेत. त्यामुळे या भागातील वातावरण नेहमी थंड असते. हे निसर्गसौंदर्य पाहून अनेकांनी या भागात घरे घेतली आहेत. मात्र आता एमएमआरडीएने ठाणे-बोरिवली बोगद्याचे काम सुरू केल्याने मुल्लाबागच्या निसर्गसौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. त्याविरोधात आज शेकडो नागरिकांनी मुल्लाबाग येथे रस्ता रोको करून प्रकल्पाचे काम बंद पाडले.

प्रकल्पाला आमचा विरोध नाही

ठाणे-बोरिवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी आमची मागणी असल्याचे स्थानिक नागरिक पंकज ताम्हाणे, डॉ. लतिका भानुशाली आणि नितीन सिंग यांनी केली. एमएमआरडीए प्रशासन हा बोगदा मुल्लाबाग येथे संपवणार आहे. मात्र बोगदा तिथे न संपवता थेट युनी अपेक्सपर्यंत नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. जर एमएमआरडीए प्रशासन आपल्या मनमानीवर कायम राहिले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

ठिकाणी परद्वार मातीची वाहतूक केली जात आहे. दररोज शेकडो डंपर या भागात ये-जा करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून नागरिकांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे.

मातीची वाहतूक करताना 2 डंपरचालकांकडून गाईडलाईनचे पालन केले जात नाही. त्यामुळे या भागात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. नागरिकांचे डोळे धुळीने भरत आहेत.

या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जुन्या वृक्षांची कत्तल केली आहे. प्रकल्पाच्या आड येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण संकुलाच्या आवारात करण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र तिला प्रतिसाद मिळाला नाही

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अशोक चव्हाण साहेब, विचारधारेशी निष्ठा नसेल तर…’, रोहित पवारांचं प्रत्युत्तर ‘अशोक चव्हाण साहेब, विचारधारेशी निष्ठा नसेल तर…’, रोहित पवारांचं प्रत्युत्तर
माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल...
मिठात कुस्करलेल्या मिरच्या, तुपाची फोडणी; अभिनेत्री ऐश्वर्या यांनी केलं काजूच्या बोंडूचं चमचमीत भरीत
Tomato Side Effects: टोमॅटो खाण्यातचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहे का?
रोज एक डाळिंब खाल्ल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आधीच सोडवता आला असता, टँकर संपावरून आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका
Saree Reuse- वॉर्डरोबमध्ये ठेवलेल्या जुन्या साड्या कशा वापरायच्या! वाचा सविस्तर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना सवाल