Mumbai Water Crisis – आजपासून महापालिका कार्यालयांवर धडक मोर्चे, आदित्य ठाकरे यांचा इशारा

Mumbai Water Crisis – आजपासून महापालिका कार्यालयांवर धडक मोर्चे, आदित्य ठाकरे यांचा इशारा

मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न आहे, आता माघार नाही, जाब विचारावाच लागेल. मुंबईतील पाणी प्रश्नावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पाण्याविना मुंबईकरांचे हाल होत असतानाही सरकारकडून अपेक्षित पावले उचलली जात नसल्याने उद्यापासून शिवसेना आणि मुंबईकर नागरिक मिळून महानगरपालिका कार्यालयांवर धडक मोर्चे नेतील, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला. मुंबईच्या पाणी प्रश्नासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नेते, उपनेते, महिला आघाडी आणि पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवन येथे बैठक झाली. त्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेनेने मुंबईतील गढूळ पाणी, कमी दाबाने येणारे पाणी आणि टँकर असोसिएशनने ऐन उन्हाळ्यात पुकारलेल्या संपाचा मुद्दा सातत्याने लावून धरलेला आहे. टँकर असोसिएशनने एक आठवडय़ाची नोटीस देऊनही सरकार हलले नाही. या संपावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने 48 तासांची डेडलाइन दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री
चित्रपटांप्रमाणेच चित्रपटातील कलाकारांच्या कथाही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नसतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याविषयी सांगणार आहोत. ज्याने आपल्या मामाच्या मुलीशी...
संतोष देशमुखचा खून पचला नाही तसंच सिंधुदुर्गातही होईल – संजय राऊत
म्यानमार आणि तिबेटनंतर नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Solapur News – गरिबांचा विठोबा होतोय कोट्यधीश, चैत्री यात्रेत 2 कोटी 56 लाखाचे उत्पन्न
जागतिक स्तरावर भूगर्भात नरेंद्र मोदींविरोधात हालचाली सुरू आहेत म्हणूनच… – संजय राऊत
Photo – कोरड पडली मुंबईकरांच्या घशाला, लाज नाही प्रशासनाला; शिवसैनिकांचा हंडा मोर्चा
अमिताभ बच्चन यांना सतावतेय ही गोष्ट, अखेर हार मानली; निराश होऊन सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली