हापूस कोकणचा की कर्नाटकचा एका झटक्यात कळणार, कोकणातील 1 हजार 845 बागायतदारांनी मिळवले जीआय टॅग

हापूस कोकणचा की कर्नाटकचा एका झटक्यात कळणार, कोकणातील 1 हजार 845 बागायतदारांनी मिळवले जीआय टॅग

लेलो भय्या लेलो कोकण का हापूस लेलो.. अशी हाकाटी देऊन अनेकदा खवय्यांच्या माथी कर्नाटकचा आंबा मारला जातो. मात्र आता ही फसवणूक थांबणार असून हापूस कोकणातील आहे की कर्नाटकातील एका झटक्यात कळणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील 1 हजार 845 बागायतदारांनी जीआय टॅग मिळवले आहेत. त्यामुळे हापूसच्या पेट्यांवर लावलेले क्यूआर कोड स्कॅन करताच ग्राहकांना आपण विकत घेत असलेला हापूस कोकणातील आहे की कर्नाटकातील हे एका झटक्यात कळणार आहे.

कोकणातील हापूसला जीआयचे संरक्षण मिळाल्यामुळे बनावट आंबे सहज ओळखता येणार आहेत. हापूस आंब्याचा जीआय टॅग कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या फळांसाठी राखीव असणार आहे. रसाळ चव आणि रंगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आंब्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही आंब्यांना हापूस टेंग वापरता येणार नाही. तसेच फळ उत्पादक आणि विक्रेत्यांची सहकारी संस्था असलेल्या संघाने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या इतर प्रदेशांमध्येदेखील उत्पादन होणाऱ्या आंब्यांसाठी वापरला जाणारा हापूस या संज्ञेच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.

तर कारवाईचा बडगा उगारणार
एका विशिष्ट प्रदेशात उत्पादित होणाऱ्या कृषी मालांनाच फक्त जीआय मानांकन लागू होते. कोकणाव्यतिरिक्त अन्य भागांत उत्पादित होणाऱ्या एखाद्या फळाच्या ब्रौंडंगसाठी हा टॅग वापरल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. कोकणातील आंबा व्यावसायिकांनी हापूसच्या ब्रँडचे होत असलेले उल्लंघन रोखण्यासाठी बाजार समित्या आणि राज्य पणन मंडळाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. राज्यातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी फळांच्या गुणवत्तेची खात्री देण्यासाठी जीआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला
शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे....
‘जनतेच्या कष्टाच्या पैशांमधून…’ दमानियांचा तटकरेंवर निशाणा, फडणवीसांनाही टोला
मोठी बातमी! ‘राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी पद्धतीचं’, सदावर्तेंचा हल्लाबोल, पोलिसांत तक्रार
तब्बल 37 वर्षांनंतर मणिरत्नम आणि कमल हासन एकत्र, चित्रपटाचे पहिले गाण झाले लाँच
शर्मिला टागोर यांचं दमदार कमबॅक; Puratawn म्हणजे एक प्रवाही महाकाव्यच…
शिर्डीला दर्शनाला चाललेल्या भाविकांच्या बसला अपघात, 35 जण जखमी
Photo – उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘थरार’ पुस्तकाचे प्रकाशन