मुंबई-नाशिक रेल्वे प्रवास आणखी गतिमान होणार, समांतर मार्गिका टाकण्याचा निर्णय
On
मुंबई ते नाशिकपर्यंतचा रेल्वे प्रवास आणखी गतिमान होणार आहे. मुंबई ते नाशिकदरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेमार्गावर समांतर रेल्वे मार्गिका टाकण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
नवीन समांतर मार्गिका जवळपास 140 किलोमीटर लांबीची असणार आहे. कसारा घाट ते मनमाड यादरम्यान समांतर मार्गिकेचे बांधकाम करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घाटातील चढणीचा अडथळा दूर होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. नवीन मार्गिकेवर 12 बोगदे असणार आहेत. ते घाटातील उंच उतारांवर नियंत्रण ठेवू शकणार आहेत. समांतर मार्गिकेमुळे कमी वेळेत मुंबईतून नाशिक गाठता येणार आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
18 Apr 2025 18:05:58
उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये गंगा नदीत राफ्टिंग करताना बोट उलटल्याने एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सागर नेगी असे...
Comment List