मोदी सरकारने बँकांना ‘कलेक्शन एजंट’ बनवलंय, मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

मोदी सरकारने बँकांना ‘कलेक्शन एजंट’ बनवलंय, मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या निर्णयाला त्यांनी जनविरोधी असल्याचं म्हणत सरकार बँकांना ‘कलेक्शन एजंट’ बनवत असल्याचा आरोप केला आहे. खर्गे म्हणाले की, या शुल्कवाढीमुळे सामान्य जनतेची लूट होत असून, सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारत आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना म्हटले की, “मोदी सरकारने बँकांना कलेक्शन एजंट बनवले आहे. मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास दंडाच्या नावाखाली बँकांनी जनतेकडून तब्बल 43,500 कोटी रुपये वसूल केले आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 28 मे रोजी एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवण्यासाठी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार, 1 मे पासून जर ग्राहकांनी एटीएममधून मासिक मोफत व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्यांना पुढील व्यवहारासाठी अतिरिक्त 2 रुपये द्यावे लागतील. यावरूनच त्यांनी ही टीका केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल
माजी आरोग्य मंत्री आणि कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांना कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं पी. एच. डी. प्रदान...
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते, त्यांच्या सैन्यात मुस्लीमही होते, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Mumbai Local – कुर्ला स्टेशनवर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून धूर, प्रवाशांची धावाधाव
लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी दिल्लीला रवाना
मध्य प्रदेशमध्ये दोन महिला माओवाद्यांचा खात्मा, दोघींच्या डोक्यावर होते प्रत्येकी 14 लाखांचे बक्षिस
IPL 2025 – राजस्थान विजयी ट्रॅकवर परतणार? दमदार यष्टीरक्षकाचं होणार पुनरागमन
BSNL ने 1,757 कोटी रुपयांवर पाणी सोडलं? कॅगच्या अहवालातून मोठा घोळ उघड