साताऱ्यातील 14 गावांत पाण्यासाठी वणवण; 26 हजार नागरिकांना टँकरने पाणी

साताऱ्यातील 14 गावांत पाण्यासाठी वणवण; 26 हजार नागरिकांना टँकरने पाणी

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढू लागला आहे. यामुळे पाणीस्त्रोत आटू लागल्याने गावोगावी पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 14 गावे, 123 वाड्यांमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आणखी पुढील दोन महिने जिल्ह्यात परिस्थिती आणखी भयाण होण्याची चिन्हे आहेत.

सातारा जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.

पाणीटंचाईबरोबर चाऱ्याचीही टंचाई जाणवू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. मार्च महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे पुढील एप्रिल व मे महिन्यात दुष्काळाचे भीषण सावट निर्माण होण्याची शक्यता आहे.

माण तालुक्यातील बिजवडी, पांगरी, मोही, डंगिरेवाडी, थदाळे, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभूखेड, जाशी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती या 16 गावांसह 123 वाड्यांमधील 26 हजार 168 नागरिक व 13 हजार 842 जनावरांना 19 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या गावांतील नागरिकांना दररोज पाण्याचा टँकर कधी येतोय याची वाट बघावी लागत आहे. गावे व वाड्यावर टँकरच्या सुमारे 51 खेपा होत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

CSK Vs LSG – चेन्नईची गाडी रुळावर परतली, लखनौला 5 विकेटने नमवलं; प्ले ऑफच्या आशा पल्लवीत CSK Vs LSG – चेन्नईची गाडी रुळावर परतली, लखनौला 5 विकेटने नमवलं; प्ले ऑफच्या आशा पल्लवीत
“करो या मरो”च्या लढतीत अखेर चेन्नईने लखनौचा 5 विकेटने पराभव करत प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. लखनौने...
‘कंगना रणौत यांना हे शोभत नाही हे…,’ अभिनेता रणदीप हुड्डा याची नाव न घेता टीका
श्रेय घेण्यासाठी भाजपने टँकर चालक असोसिएशनचा संप दोन दिवस चिघळत ठेवून मुंबईकरांना वेठीस धरलं – आदित्य ठाकरे
बीडपेक्षा सिंधुदुर्गची अवस्था भयानक; तरुणाला नग्न करत मारहाण करून केली हत्या; सिद्धेश शिरसाटचा आका कोण?
Solapur News – कुंभारी टोल नाक्याजवळ एसटी बसने घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवासी सुखरुप
CSK Vs LSG – खलील अहमदने पहिल्याच षटकात विकेट घेतं विक्रमाला घातली गवसणी
सलमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; करुणा शर्मांना वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य