घोड धरणाचा पाणी प्रश्न पेटणार, साकळाई उपसा योजनेस शेतकऱ्यांचा विरोध

घोड धरणाचा पाणी प्रश्न पेटणार, साकळाई उपसा योजनेस शेतकऱ्यांचा विरोध

शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणामधून नगर तालुक्यातील गावांसाठी होणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस शिरूर तालुक्यातील मूळ लाभार्थी शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, ही योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकरी, ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस तीव्र विरोध सुरू केला आहे. याबाबतचे निवेदन शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना दिले आहे. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील, तालुका सल्लागार संतोष काळे, शेतकरी सुभाष पवार, हरिचंद्र पवार, संदीप सूर्यवंशी, प्रदीप काळे, माउली नागावडे, वसंत रोकडे, अनिल ओव्हाळ पाटील उपस्थित होते.

शिरूर तालुक्यातील चिंचणी गावात घोड धरण असून, साकळाई उपसा योजनेस शेतकऱ्यांचा विरोध या धरणाचा पाणीसाठा सुमारे 7 टीएमसी आहे. या धरणाच्या पाण्यामुळे शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील अनेक गावे जलसिंचनाखाली आलेली आहेत. या धरणामधून दोन कालवे असून, एक श्रीगोंदा तालुक्यातील गावातील मूळ लाभार्थ्यांसाठी आहे, तर दुसरा शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, तसेच याच धरणामधून पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा होत आहे. तसेच अनेक पिण्याच्या पाणीपुरवठा योजना असून, अनेक शेतकऱ्यांच्या उपसा जलसिंचन योजना आहेत.

उन्हाळ्यामध्ये धरणातून होत असलेल्या कालव्यातील आवर्तनांना मुळात आताच मोठ्या प्रमाणात अडचण येत असून, मे महिन्यात पिके अडचणीत येत असतात. अशातच आता नवीन साकळाई उपसा जलसिंचन योजनेला शासनाने परवानगी दिली असल्याचे दिसून येत आहे.

या योजनेमुळे नगर तालुक्यातील वाळकी, चिखली अशी ३२ गावे ओलिताखाली आणण्याचा सरकारचा मानस दिसून येत आहे. या उपसा सिंचन योजनेसाठी 1.8 टीएमसी म्हणजेच सुमारे २ टीएमसी पाणी लागत आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनदेखील योजनेचा हेतू सफल होण्याबद्दल शांशकता निर्माण होत आहे. कारण ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार?’ आधीच या धरणातून पाण्यासाठी आदळआपट सुरू आहे. त्यामुळे सरकारने अशा पद्धतीचा नाहक खर्च करू नये. त्यापेक्षा कुकडी कालव्यातून विसापूर धरणात पाणी सोडून त्यातून सदर योजना राबविल्यास जास्त लाभदायक व कमी खर्चात यशस्वी योजना राबविता येईल.

साकळाई जलसिंचन योजनेमुळे या धरणावर अवलंबून असलेले शिरूर तालुक्यातील मूळ धरणग्रस्त, चिंचणी, शिंदोडी, वडगाव यांनाही याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. तसेच या धरणाच्या दोन्ही कालव्यांवरचे मूळ लाभार्थी शेतकरीदेखील अडचणीत येणार, यात तीळमात्र शंका नाही.

त्यामुळे साकळाई जलसिंचन योजनेस स्थानिक शेतकरी, तसेच दोन्ही कालव्यांवर अवलंबून असलेले शिरूर व श्रीगोंदा तालुक्यांतील मूळ लाभार्थी शेतकरी यांचा विरोध असून, शासनाने ही योजना बळजबरीने लादल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी जनआंदोलन करतील, याची दक्षता शासनाने घ्यावी, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! वाल्मिक कराडला काम संपल्यावर मारण्याचा प्लान?; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ मोठी बातमी ! वाल्मिक कराडला काम संपल्यावर मारण्याचा प्लान?; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरूंगात कैद आहे. कराड आणि त्याच्या गँगचे अनेक...
लाडक्या बहीण योजनेबाबत संजय राऊत यांचा दावा काय? राऊत म्हणाले, आता नवा वाद…
गोविंदाला घटस्फोट देण्याबद्दल पत्नी सुनिताची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाली, “तू जरा जास्तच..”
Divyanka Tripathi Divorce Rumoures : टीव्हीच्या आणखी एका सुनेचा संसार मोडणार ? दिव्यांका त्रिपाठीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
म्हातारपण दिसून येतंय.. म्हणणाऱ्यांना सलमान खानने असं दिलं उत्तर; ट्रोलर्सची बोलतीच बंद
‘अखेरच्या श्वासापर्यंत तिच्यासाठी भांडेन..’; ऐश्वर्याबद्दल ‘ती’ बातमी देणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांनी सुनावलं
‘लाज वाटली पाहिजे त्या लोकांना…’, Nisha Rawal ने ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, व्हिडीओमुळे वाद