चाळीस कोटी कोणाच्या घशात? जलजीवन योजनेचे बारा वाजले; आसनगावात पाणीटंचाईचे चटके

चाळीस कोटी कोणाच्या घशात? जलजीवन योजनेचे बारा वाजले; आसनगावात पाणीटंचाईचे चटके

शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या ४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. या योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांना आजही पाण्यासाठी झगडावे लागत आहे. जलकुंभाचे काम, पाइपलाइन टाकण्याची कामे रखडली आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शहापूर उपविभागाच्या देखरेखीखाली सुरू आहेत, मात्र अधिकाऱ्यांची पूर्ण बेफिकिरी दिसून येत आहे.

या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी जबाबदार असलेले अभियंते साईटवर हजर राहत नसल्याने ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. प्राधिकरणाचे उपअभियंता केतन चौधरी यांनी ठेकेदाराला अभय दिल्याचा आरोप तक्रारदार प्रशांत गडगे आणि शिवाजी देशमुख यांनी केला आहे. योजनेसाठी ९ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता तर ३० जानेवारी २०२३ रोजी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला. नियमानुसार १८ महिन्यांत काम पूर्ण करून पुढील १२ महिने योजना सुरळीत चालवणे बंधनकारक होते. मात्र अद्याप ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही.

दोन दिवसांपूर्वी केलेला रस्ता खोदला

ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा आणखी एक प्रकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अवघ्या दोन दिवसांपूर्वी नव्याने बांधलेला रस्ता ठेकेदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता खोदला. लाखो रुपयांचा सरकारी निधी वाया घालवून या रस्त्यावर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले. त्यामुळे संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झाला असून मुख्य रस्त्यावर माती आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’, मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय, पंकजा मुंडे यांचे वक्तव्याची राज्यभर चर्चा ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’, मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय, पंकजा मुंडे यांचे वक्तव्याची राज्यभर चर्चा
‘एक छंद मकरंद’ या गीताने अनेकांच्या दिवसांची सुरुवात होते. हे गीत आताच आठवण्याचे कारणही तसेच आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी...
Aurangzeb Tomb : औरंगजेबाचे थडगे सरकार पाडणार? मुख्यमंत्री म्हणाले घाईने….
मुंबईकरांनो, मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक… लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
गोविंदा शेर तर पत्नी सुनीता होणार सव्वाशेर; लवकरच एका गोष्टीची घोषणा
बॉलिवूडचा ‘फ्लॉप’ हिरो, बायकोच्याच बेस्टफ्रेंडसोबत केलं लग्न, 129 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का?
बनावट ‘शेरखान अॅप’च्या माध्यमातून घातला 71 लाखांचा गंडा
आमदार धसांच्या लाडक्या खोक्याभाईच्या घरावर धाड, शिकारीचे साहित्य सापडले