‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन?

‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन?

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हातील खुलताबाद येथे आहे. आता औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको, त्याची कबर हटवण्याची मागणी होत आहे. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादानंतर नागपुरात हिंसाचार उसळला आहे. ज्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता विक्की कौशलच्या ‘छावा’ सिनेमाला जबाबदार धरलं. ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत… असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं.

सांगायचं झालं तर, सध्या नागपुरात तणावपूर्ण वातावरण आहे. याच कारणामुळे विकी कौशल आणि ‘छावा’ सिनेमाला लक्ष्य केलं जात आहे. यावर विकी कौशलच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. हिंसाचारासाठी विकी कौशल आणि त्याच्या सिनेमाला दोष देणं पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे, असं अभिनेत्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

 

 

एक नेटकरी म्हणाला, ‘नागपूर हिंसाचारासाठी विकी कौशलला दोष देणं अत्यंत चुकीचे आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नागपूर हिंसाचार प्रकरणी विकी कौशल याला दोष देणे अत्यंत चुकीचे आहे. छावा सिनेमात विकी फक्त भूमिका साकारली आहे. निर्मात्यांनी औरंगजेबाची क्रुरता दाखवली आहे. आता या देशातील काही लोकांसाठी औरंगजेब महान झाला आहे.’

 

 

विकी कौशल याचं समर्थन करत आणखी एक चाहता म्हणाला, ‘त्या लोकांवर संताप व्यक्त करा ज्यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणी ‘छावा’ सिनेमाला जबाबदार ठरवलं आहे.’ सोशल मीडियावर विकीच्या चाहते अभिनेत्याची बाजू मांडताना दिसत आहेत.

काय म्हणाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्र विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात उसळलेल्या हिंसाचाराचे वर्णन पूर्वनियोजित असल्याचे सांगितले आणि जमावाने आधीच दुकाने आणि घरे फोडली होती आणि त्यांनाच लक्ष्य केले होते, अशी माहिती आहे. यामुळे हे षडयंत्र असल्याचा भास होतो. राज्यात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

देवेंद्र फडणवीस ने हिंसा को बताया पूर्वनियोजित

महाराष्ट्र विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे सांगितलं आणि जमावाने आधीच दुकाने आणि घरे फोडली होती आणि त्यांनाच लक्ष्य केलं होतं… यामुळे हे षडयंत्र असल्याचा भास होतो. राज्यात शांतता राखण्याचे आवाहन देखील फडणवीस यांनी यावेळी केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ठाणे ते बोरीवरी दुहेरी बोगद्याचा मार्ग मोकळा, MMRDA आणि MEIL विरोधातील याचिका फेटाळली ठाणे ते बोरीवरी दुहेरी बोगद्याचा मार्ग मोकळा, MMRDA आणि MEIL विरोधातील याचिका फेटाळली
    ठाणे ते बोरीवरी दुहेरी बोगद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीए आणि एमईआयएलविरुद्धची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
बॉलिवूडचे ‘हे’ 5 सेलिब्रिटी ज्यांनी चाळीशीनंतर थाटला संसार, एका अभिनेत्याचं तर तिसरं लग्न
‘ना डान्स येत, ना डायलॉग बोलता येत…’, अभिनेत्रीची ऑडिशन पाहून करण जोहर भडकला, केला सर्वांसमोर अपमान
लाइव्ह शोमध्ये शोएब मलिकला तिसऱ्या पत्नीने म्हटलं ‘बदतमीज’; ट्रोल्स म्हणाले ‘सानिया मिर्झा असती तर..’
या 5 स्टार किड्सचे करिअर सुपर फ्लॉप झालं; प्रेक्षकांनी नाकारले चित्रपट, आता हे कलाकार काय करतायत?
‘संपत्तीमध्ये आणखी किती हिस्से…’, आमिर खानचा नव्या गर्लेफ्रेंडसोबत ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
अखेर सलमान – ऐश्वर्याच्या ब्रेकअपमागील खरं कारण आलं समोर; विवेकसोबतचं नातं होतं ‘फेक’?