हा नवीन हिंदुस्थान आहे, संसदेत बोलू न दिल्याने राहुल गांधी यांचा संताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत संबोधन करताना प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले. यावेळी विरोधकांनी महाकुंभामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पंतप्रधान बोलत नसल्याने तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी यावर संताप व्यक्त केला.
पंतप्रधानांनी जे बोलले त्याला मला पाठिंबा द्यायचा होता. कुंभ आपला इतिहास, परंपरा, आपली संस्कृती आहे. पण एक तक्रार आहे की त्यांनी महाकुंभमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली नाही वाहिली. जे तरुण महाकुंभात गेले त्यांना पंतप्रधानांकडून रोजगार हवा आहे. त्या रोजगाराविषयीही त्यांनी बोलायला हवे होते पण ते बोलले नाहीत. लोकशाहीत विरोधी पक्ष नेत्याला बोलण्याचा अधिकार असतो. मात्र हे तो अधिकारही देत नाही. हा नवीन हिंदुस्थान आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List