कल्याण-डोंबिवली पालिका मालामाल, पंधरा दिवसांत ९७ कोटींची वसुली

कल्याण-डोंबिवली पालिका मालामाल, पंधरा दिवसांत ९७ कोटींची वसुली

लटकलेल्या मालमत्ता आणि पाणी बिलाच्या रकमेवर महापालिकेने व्याज माफ केल्याने पंधरा दिवसांत जवळपास ९७ कोटींची वसुली झाली आहे. नागरिकांनी पालिकेने तयार केलेल्या सुविधा केंद्रांवर रांगा लावून मालमत्ता व पाणी बिलाची रक्कम भरली. त्यामुळे थकलेल्या पैशांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून तगादा लावणारी महापालिका पंधरा दिवसांत मालामाल झाली आहे.

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी एकरकमी भरल्यास १०० टक्के व्याज माफी देण्यात आली होती. महापालिकेने देयके बिले वितरित केल्यानंतर १ ते १५ मार्च या पंधरा दिवसांत ९६.७४ कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. ९ हजार ४०५ करदात्यांनी थकीत रक्कम भरली.

करदात्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित करदात्यांनी याचा लाभ घ्यावा आणि महापालिकेच्या विकासकामांना आर्थिक हातभार लावावा, असे करविभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम …तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम
नागपूर हे निसर्गाचे वरदान असणारे टुमदार शहर काल सुर्यास्तानंतर दगडफेक आणि जेसीबी वाहनांच्या धुराने अचानक वेढले. दोन्ही बाजूंनी जमावाने घोषणाबाजी...
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घातले? कोणी केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
कुणी तरी येऊन सांगितलं… चला हिंदूंना मारायला… मुस्लमानांना…; किरण मानेची नागपूर दंगलीवरून टीका
Ratnagiri News – पर्यटकांसाठी करमणुकीची नवी मेजवानी! थिबा पॅलेस येथे मल्टिमीडिया शो सुरू
रसगुल्ला खाताच जमिनीवर कोसळला आणि मरण पावला, काय घडलं नेमकं?
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला; अटक होण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 357 गावातील 722 वाड्यांमध्ये पाणीटंचाईची शक्यता; संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार