निखळलेले प्लास्टर, गंजलेल्या सळ्या, कमकुवत कठडे ; बामणघर-गौळवाडी पुलाची ‘सावित्री’ होण्याचा धोका

निखळलेले प्लास्टर, गंजलेल्या सळ्या, कमकुवत कठडे ; बामणघर-गौळवाडी पुलाची ‘सावित्री’ होण्याचा धोका

बामणघर-गौळवाडी पुलाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. निखळलेले प्लास्टर… गंजलेल्या सळ्या, कमकुवत कठडे यामुळे लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असून ‘सावित्री’ होण्याचा धोका आहे. सावित्रीसारखी पुनरावत्ती होऊन अनेकांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल तळावासीयांनी विचारला आहे.

बामणघरपासून गौळवाडीला जाण्यासाठी तीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. बामणघरहून गौळवाडीला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून दररोज लाखो गावकरी या पुलाचा वापर करतात. काही महिन्यांपूर्वी हा पूल एका बाजूला खचला. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

अखेर ग्रामस्थांनी श्रमदान करून पुलाची डागडुजी केली. पुलावरून बारमाही वाहतूक सुरू असते. प्लास्टर निखळून सळ्या बाहेर आल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. या पुलाची पुरती दैना झाली असून पावसाळ्यात तर पुलावरून पाणी जाते. अशातच गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. भविष्यातील संभाव्य धोका टाळावा याकरिता पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्री म्हणाले नागपूर दंगल पूर्वनियोजित; सोशल मीडियावर ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत मुख्यमंत्री म्हणाले नागपूर दंगल पूर्वनियोजित; सोशल मीडियावर ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत
नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या दंगलीवरून विरोधकांनी विधिमंडळात सरकारला धारेवर धरले. अखेर नागपूर दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यावेळी...
Buldhana News – पाडकाम करताना घर अंगावर कोसळलं, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
गुहागरच्या खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात बोगस प्रवेश अन् करोडोंचा गैरव्यवहार, भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप
निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक करण्याचा निर्णय
सरकारचे अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला औरंगजेबाची कबर आठवते का? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
…तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम