‘माझं काही खरं नाही’, म्हणणारे जयंत पाटील बारामतीत शरद पवार यांना भेटले; सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. दुसरीकडे भाजप आणि अजित पवार गटाकडूनही जयंत पाटील यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान जयंत पाटील यांनीही ‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’ असे म्हणत एक मोठे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या मनात नक्की चाललेय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेते बारामतीमध्ये एकत्र दिसले. तत्पूर्वी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यातही तासभर चर्चा झाली.
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्रातील उसाच्या शेतीची त्यांनी पाहणी केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली.
दरम्यान, जयंत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला टोला लगावला होता. जयंत पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा झाली असून राज्याच्या दौऱ्याबाबत नियोजन आम्ही केले आहे. इतकी मोठी संघटना, इतका मोठा पक्ष असूनही त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटत आहेत, ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला लगावला.
राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा; जयंत पाटील म्हणाले, तर आठ दिवसांत राजीनामा देतो
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List