भर समुद्रात थरार; समुद्राच्या लाटांमुळे बोटीला पडले छिद्र, स्पीड बोटीमुळे वाचले 130 प्रवाशांचे प्राण
समुद्रामध्ये जोरदार वारा सुटल्यामुळे मुंबईहून मांडवाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बोटीला छिद्र पडले. छिद्र पडल्यामुळे बोटीमध्ये पाणी भरले आणि 130 प्रवशांचा जीव टांगणीला लागला. परंतु वेळीच मदतीसाठी फोन केल्यामुळे सर्व प्रवशांचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजठा कंपनीची प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाहून 130 प्रवाशांना घेऊन 5.30 च्या सुमारास मांडवा येथे जाण्यासाठी निघाली होती. साधारण 1 ते 1.5 किमी अंतरावर बोट गेली असता वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटा बोटीला जोरजोरात धडकू लागल्या. बोट फायबरची असल्यामुळे बोटीला छिद्र पडले आणि त्यामुळे बोटीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवशांनी तत्काळ मांडवी जेटी येथे फोन करून मदत मागितली. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता मांडवी जेटीवरुन तत्काळ स्पीड बोट समुद्रात मदतीसाठी धावल्या. 130 प्रवशांना सुखरुप मांडवी जेटी येथे आणण्यात आले आहे. तसेच अजंठा कंपनीची बोटही सुखरूप मांडवी जेटी आणली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List