देवदर्शन करून घरी परतत होते, मात्र वाटेतच काळाचा घाला; कार पुलावरून कोसळून चौघांचा मृत्यू
देवदर्शन करून घरी परतत असताना अनियंत्रित कार पुलावरून कोसळून चौघांचा मृत्यू झाला. कारमधील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
एकाच कुटुंबातील आठ जण नरसिंहपूर येथील दादा दरबारात दर्शनासाठी गेले होते. तेथे प्रतीकात्मकरित्या एक बकरी आणि एक कोंबडीचा बळी दिल्यानंतर ते जबलपूरला परतत होते. घरी आल्यानंतर कुटुंब चिकन आणि मटणाची मेजवानी देणार होते. मात्र तत्पूर्वी वाटतेच काळाने घाला घातला आणि चौघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.
विशेष म्हणजे अपघातात बकरा सुखरुप बचावला आहे. किशन पटेल (35), महेंद्र पटेल (35), सागर पटेल (17), राजेंद्र पटेल (35) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर मनोज प्रताप (35) आणि जितेंद्र पटेल लोधी (36) अशी जखमींची नावे आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List