29 एप्रिलपर्यंत देश सोडा, अन्यथा दंड भरा; सौदीचा घुसखोरांना अलर्ट

29 एप्रिलपर्यंत देश सोडा, अन्यथा दंड भरा; सौदीचा घुसखोरांना अलर्ट

सौदी अरबने हिंदुस्थान, पाकिस्तानसह एकूण 14 देशांतील नागरिकांवर व्हिसा बंदी घातली असताना आता हज यात्रेसाठी आलेल्या आणि गुपचूप सौदीत थांबलेल्या घुसखोरांना सौदी सरकारने अलर्ट दिला आहे. येत्या 29 एप्रिलपर्यंत देश सोडा अन्यथा मोठा दंड आकारला जाईल, असा इशारा दिला आहे. उमराहसाठी 13 एप्रिलपर्यंत सौदीत येण्याची परवानगी आहे. परंतु त्यानंतर 29 एप्रिलला कोणत्याही परिस्थितीत देश सोडावा लागेल, असे सौदीने म्हटले आहे. जर 29 एप्रिलनंतर सौदीत थांबल्यास त्यांच्यावर व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा खटला दाखल होऊ शकतो, असे सौदीने म्हटले आहे. उल्लंघन करणाऱयांविरुद्ध 1 लाख सौदी रियाल म्हणजेच 22.94 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. हे पाऊल सौदी सरकारने हज यात्रेआधी उचलले आहे. हज यात्रेतील गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

18 हजार लोकांना अटक

सौदीत बेकायदेशीर राहणाऱयांविरुद्ध सौदी सरकारने कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. व्हिसा संपल्यानंतरसुद्धा अवैध मार्गाने सौदीत राहणाऱया 18 हजार 407 विदेशी नागरिकांना सीमा सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. दोषी आढळणाऱया विदेशी नागरिकांना 15 वर्षे तुरुंगवास किंवा जवळपास 2.30 कोटी रुपयांचा दंड किंवा दोन्ही होऊ शकते. या वर्षी हज यात्रा 4 जूनपासून सुरू होणार आहे. त्यासाठी सौदी सरकारने देशात बेकायदेशीर मार्गाने राहणाऱया विदेशी लोकांना देशाबाहेर काढण्यासाठी मोहिम राबवली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला
शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे....
‘जनतेच्या कष्टाच्या पैशांमधून…’ दमानियांचा तटकरेंवर निशाणा, फडणवीसांनाही टोला
मोठी बातमी! ‘राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी पद्धतीचं’, सदावर्तेंचा हल्लाबोल, पोलिसांत तक्रार
तब्बल 37 वर्षांनंतर मणिरत्नम आणि कमल हासन एकत्र, चित्रपटाचे पहिले गाण झाले लाँच
शर्मिला टागोर यांचं दमदार कमबॅक; Puratawn म्हणजे एक प्रवाही महाकाव्यच…
शिर्डीला दर्शनाला चाललेल्या भाविकांच्या बसला अपघात, 35 जण जखमी
Photo – उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘थरार’ पुस्तकाचे प्रकाशन