बदलापूरसारख्या घटना रोखायलाच हव्यात – हायकोर्ट
बदलापूर बाल अत्याचारसारख्या घटना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत. यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचनाही शाळा सुरक्षा समितीने केल्या आहेत. तरीही या मार्गदर्शक सूचना जारी करायला टाळाटाळ का करताय, असे खडेबोल उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला सुनावले.
शाळा व अंगणवाडी सेविका विभागाचा अभिप्राय आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. यासाठी आठ आठवडय़ांची मुदत द्यावी, अशी विनंती अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला. शालेय मुलांच्या सुरक्षेसाठी शासनाने तत्परता दाखवायला हवी. याकरिता आठ आठवडय़ांचा वेळ देता येणार नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List