आजपासून मुंबईतील 1800 टँकर संपावर; हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालये, सोसायट्या, बांधकामांना बसणार फटका

आजपासून मुंबईतील 1800 टँकर संपावर; हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालये, सोसायट्या, बांधकामांना बसणार फटका

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अंमलबजावणी करत मुंबई महापालिकेने विहिरी आणि बोअरवेल मालकांना बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशन ठाम असून गुरुवारपासून बेमुदत संप सुरू होणार आहे. यात 1800 टँकर्स सहभागी होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालये, गृहनिर्माण सोसायटय़ा आणि इमारतींच्या बांधकामांवर मोठा परिणाम होणार आहे.

मुंबईतील विहिरी आणि बोअरवेल मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार पालिकेच्या कीटकनाशक विभागाने नोटिसा बजावल्यामुळे विहिरी आणि बोअरवेल मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या या भूमिकेविरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

विहिरी, बोअरवेल मालकांना पाठवलेल्या नोटिसीत काय म्हटलेय 

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमानुसार मुंबईतील विहिरी किंवा बोअरवेल मालकांना पालिकेची एनओसी घेणे बंधनकारक केले आहे, मात्र एनओसी मिळवण्यासाठी विहिरीभोवतीची दोन हजार फुटांची जागा मोकळी सोडावी, पाणी भरताना टँकर्स सोसायटी किंवा चाळीजवळ उभे करू नयेत, पाण्याचे पूर्ण वर्षांचे पैसे आगाऊ भरावेत, टँकर्सवर मीटर बसवावेत, रेन वॉर्टर हार्वेस्टिंग करावे यासह इतर अटी आहेत, मात्र यातील पहिल्या दोन अटींमुळेच टँकर्सचालक संतापले आहेत. या विहिरी कित्येक वर्षांपासून असून आता त्या सोसायटी, चाळ किंवा खासगी मालकाच्या घराजवळ आहेत. असे असताना या नियमांचे पालन करणे जवळजवळ अशक्य आहे, असे टँकर्सचालकांचे म्हणणे आहे

राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेच्या वतीने आतापर्यंत तरी आम्हाला संपर्क करण्यात आलेला नाही. 5 एप्रिलच्या बैठकीत तसेच 7 एप्रिलला आम्ही सरकारला संपाचा इशारा दिला होता, मात्र सरकारने आमच्याकडे जराही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे गुरुवारपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत. 

– जसबीरसिंह बिरा, अध्यक्ष, मुंबई वॉटर टँकर असोसिएशन

काय होऊ शकते कारवाई 

मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने विहिरी आणि बोअरवेल मालकांना आतापर्यंत दोन नोटिसा पाठवल्या आहेत. त्यापैकी पहिल्या नोटिसीत सात दिवसांत तर दुसऱ्या नोटिसीत तीन दिवसांत एनओसी घेण्याची ताकीद दिली आहे. विहिरीमालकांना दुसरी नोटीस देण्यात आली असून आज त्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अशा विहिरींमधून पाणी घेतले तर पालिका कारवाई करील, या भीतीने टँकर्सचालकांना विहिरी, बोअरवेलमधून पाणी घेणे थांबवले आहे. दरम्यान, विहिरी, बोअरवेल मालकांनी एनओसी घेतली नाही तर  महापालिका या जुन्या विहिरी आणि बोअरवेल बुजवून टाकू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी… हिंदीवरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर या नेत्याचा घणाघात तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी… हिंदीवरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर या नेत्याचा घणाघात
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात वातावरण तापले आहे. शिक्षण क्षेत्रात हिंदीची ही सक्तीची घुसखोरी वादात अडकली आहे. मनसेच नाही...
‘पैसे कमावण्यासाठी मी कोणत्याही…’, 6 कोटींची गुंतवणूक, शिल्पा शेट्टीला 573% फायदा, असं केलं तरी काय?
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार; अजान रोखण्याचा केल्याचा प्रयत्न आरोप
भाजपच्या आशीर्वादानेच पालिकेत भ्रष्टाचार! प्रशासकांच्या मनमानीला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा
नाव ‘चितळें’चे, पण बाकरवडी भलतीच
आयब्रोज विरळ आहेत धड आकारही नाहीये, मग आता चिंता सोडा! घरच्या घरी या उपायांनी आयब्रोजला द्या नवा लूक
रेश्मा केवलरमानी जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत, हिंदुस्थानी वंशाची एकमेव महिला