बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, अमित शहा यांनी खेळली महाराष्ट्राची चाल

बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, अमित शहा यांनी खेळली महाराष्ट्राची चाल

बिहारमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका या नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येतील, अशी घोषणा करत पेंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी महाराष्ट्राची चाल खेळली. नितीश कुमार यांचे हात आणखी मजबूत करा असे आवाहनही त्यांनी केले. गोपाळगंज येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

एनडीएममध्ये पाच पक्ष आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्ह कोणतेही असो, एनडीएलाच विजयी करायचे आहे. पक्षात कितीही मतभेद असू द्या, ते विसरून एकत्र या आणि एनडीएला विजयी करा असे आवाहन शहा यांनी केले. दरम्यान, यावेळी त्यांनी आरजेडीचे प्रमुख लालु प्रसादव यादव आणि त्यांची पत्नी तसेच बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यावरही टीका केली. त्यांनी 15 वर्षे राज्य केले. परंतु, बिहारमध्ये जंगलराज होते, असा आरोप त्यांनी केला.

दोनवेळा चूक झाली– नितीश कुमार

दोनवेळा चूक झाली परंतू, आता इकडे तिकडे जाणार नाही असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. पूर्वी बिहारमध्ये गुंडाराज होते, परंतु, आता लोक रात्री उशिराही रस्त्यावर फिरू शकतात असा दावाही नितीश कुमार यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सीबीएसईप्रमाणे भौतिक सुविधा, मनुष्यबळही पुरविणार का? ज. मो. अभ्यंकर यांचा प्रश्न सीबीएसईप्रमाणे भौतिक सुविधा, मनुष्यबळही पुरविणार का? ज. मो. अभ्यंकर यांचा प्रश्न
राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू करण्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि...
IPL 2025 – 27 करोड पाण्यात; ऋषभ पंतच्या लखनऊचा पराभव, पंजाबने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी
राज्यातील या शहरांमध्ये धावणार बाईक टॅक्सी, मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय
कल्याण डोंबिवलीत एप्रिल फुलवरून राजकीय वाद पेटला, मनसेचे सत्ताधाऱ्यांना झोंबणारे बॅनर, शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर
Waqf Amendment Bill – चर्चेत सहभागी होणार आणि विधेयकाविरोधात मतदान करणार; इंडिया आघाडीची बैठकीत वज्रमूठ
चंद्रपूर शहरात खड्ड्यांनी प्रदूषण वाढविले, मार्च महिना ठरला सर्वाधिक प्रदूषित
आधी पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत लग्न लावले, नंतर पश्चाताप झाल्यावर पतीचे धक्कादायक कृत्य