बायांनो, कडक उन्हात स्वयंपाक करणं टाळा, मुंबई महापालिकेच्या गाईडलाइनमध्ये काय काय ?

बायांनो, कडक उन्हात स्वयंपाक करणं टाळा, मुंबई महापालिकेच्या गाईडलाइनमध्ये काय काय ?

तोंडावर आलेल्या उन्हाळ्यामुळे मुंबईकरांच्या घामाच्या धारा वहायला लागल्या आहेत. येत्या काही काळात तापमानाचा वार प्रचंड वाढणार असून त्यामुळे उष्माघाताचे प्रकार होऊ नयेत, नागिरकांना त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने उष्माघात नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी काही खास गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. मुंबईत जाणवत असलेल्या उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या काळात काय करावे? आणि काय करू नये याबाबतच्या थेट सूचना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नियमित करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे आणि सावध रहावे, उष्माघातापासून बचाव करावा असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

काय आहे मुंबई महापालिकेच्या गाईडलाइन्स ?

– कडक उन्हाच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा.

– स्वयंपाकघरात हवा खेळती रहावी यासाठी दरवाजे, खिडक्या उघडे ठेवा.

– मद्य, चहा, कॉफी, कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे, कारण ते शरीराला हानी पोहोचवू शकतात.

– शिळे अन्न खाऊ नका.

– सावध रहा, स्वत:ची काळजी घ्या.

उन्हाचा तडाखा वाढल्याने माठांच्या, रांजणांच्या किमतीत वाढ

दरम्यान उन्हाचा तडाखा वाढल्याने मातीचे माठ आणि राजणांच्या किमतीत वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने बाजारात गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. पण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा माठांच्या किमती 50 ते 100 रुपयांनी वाढल्या आहेत. माठ तयार करण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या किमती वाढल्या असून वाहतूक खर्चही वाढला आहे. त्यामुळे या गरिबांचा फ्रीज अर्थात माठांचे दर वाढले आहेत. यंदा एका मध्यम आकाराच्या माठाची किंमत 250 ते 300 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ग्रामीण भागातील आणि शहरातील नागरिक उन्हाच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी आणि पाणी गार ठेवण्यासाठी माठ आणि रांजणांची मागणी करत आहेत. या विक्रेत्यांच्या मते, उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिकचा पारा पोहोचला 38 अंशांवर

मार्च महिन्यातच नाशिकचा पारा 38.7 अंशांवर पोहोचला असून तापमान वाढल्याने नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिकांकडून टोपी आणि स्कार्फचा वापर वाढला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिकच्या तापमानात वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सर्वाधिक 40 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरात देखील मार्च महिन्यातच तापमान 38.7 अंशावर गेल्याने पुढच्या काही दिवसात तापमान 40° वर जाण्याची देखील शक्यता आहे. दुपारच्या सुमारास काम नसेल तर बाहेर न फिरण्याचा वैद्यकीय तज्ञांनी नागरिकांना सल्ला दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपूरात दरवर्षी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधन करीत असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत...
IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट; पुढील 24 तास धोक्याचे, आयएमडीकडून मोठी बातमी
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; 2100 रुपयांबाबत आतली बातमी समोर
मुंबईत भीषण अपघात, कार एकमेकांवर आदळल्या; दोघांचा मृत्यू
‘सैतानाने मला कधी विवस्त्र केले कळाले नाही’, मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य
उसाचा किंवा द्राक्षांचा रस नाही तर प्या चंदनाचं सरबत, दिसतील चमत्कारिक फायदे, कसं बनवायचं पाहा
तुमची त्वचा कोरडी आहे? हे घरगुती टोनर सर्वोत्तम, त्वचेच्या समस्या लवकरच होतील दूर