‘औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय…’, लेखकाच्या वक्तव्यानंतर मुस्लिम धर्मगुरूंकडून प्रत्युत्तर

‘औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय…’, लेखकाच्या वक्तव्यानंतर मुस्लिम धर्मगुरूंकडून प्रत्युत्तर

देशात मुघल शासक औरंगजेबाबाबतचा वाद दिवसागणिक आणखीनच चिघळत चालला आहे. हे वाद आता राजकारणी व्यक्तींपासून लेखल आणि मौलानांपर्यंत पोहोचले आहेत. नुकताच प्रसिद्ध लेखक मुंतशिर याने औरंगजेबाबाद्दल मोठं वक्तव्य केलं. आता त्याच्या वक्तव्यावर मुस्लिम धर्मगुरूंनीही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज मुंतशीर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुस्लिम धर्मगुरू मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी म्हणाले, ‘मनोज मुंतशीर हे पूर्ण मानसिक दिवाळखोरीचे बळी आहेत.’

शहाबुद्दीन रिझवी बरेलवी म्हणाले, ‘मनोज मुंतशिर यांना सुशिक्षित समजलं जातं. एक साक्षर व्यक्ती इतकं वाचाळ वक्तव्य कशी करू शकते. केवळ मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीच असं वाईट विधान करू शकते. मनोज मुनताशीर हे लेखक नसून ते मनाने दिवाळखोर आहेत… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मनोज याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाला मनोज मुंतशिर?

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध लेखक, मनोज मुंतशिर हे अनेकदा आपले विचार खुलेपणाने मांडण्यासाठी ओळखले जातात. आपले मत मांडण्यात तो कधीही मागेपुढे पाहत नाही. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या वक्तव्याची कायम चर्चा रंगलेली असते. ज्यामुळे त्यांना वादग्रस्त परिस्थितीचीा सामना करावा लागतो. दरम्यान, सध्या महाराष्ट्रात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर वाद सुरु आहे. वाद सुरु असताना प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर याने मोठं वक्तव्य केलं.

मनोज मुंतशिर म्हणाले, ‘महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी… यावरून अनेक वाद होत आहे. औरंगजेबाची कबर तोडावी अशी अनेकांची मागणी आहे… मला असा बिलकूल वाटत नाही. पण ती कबर काढून टाकावी? जेव्हा आपण हिंदू रामजन्मभूमीवर श्री रामाचं मंदिर बांधत होतो, तेव्हा काही लोक आपल्याला ज्ञान देत होते की देव प्रत्येक कणात आहे, मग मंदिर बांधण्याची काय गरज आहे वगैरे! त्या जागेवर शाळा, रुग्णालय बांधा… असं अनेक जण म्हणाले.

‘औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची गरज नाहीये, तर त्यावर शौचालय बांधा… अशी माझी मागणी आहे. आपण सनातनी आहोत. आपण त्या खुन्याला किमान किमान युरिया आणि मीठ दान करू शकतो. आणि जे म्हणतात नाही भारत कोण्च्या बापाचा नीही . तर मला सांगायला आवडेल की, ‘हिंदूस्थान आमचे राणा, छत्रपती शिवाजी महाराज.. आमच्या बापाचा  होता आणि राहिल..’ असं देखील मनोज म्हणाला सध्या लेखकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत बदल, कोणते मार्ग राहणार बंद? राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत बदल, कोणते मार्ग राहणार बंद?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा आयोजित केली आहे. ही सभा...
प्रचंड ग्लॅमरस आहे राधे माँची सून, फिटनेस आणि अध्यात्म दोन्हीमध्ये सक्रिय
Sikandar Review: पुन्हा एक फ्लॉप सिनेमा… काय आहे सलमान खानच्या ‘सिंकदर’ची कथा? वाचा रिव्ह्यू
Sikandar Leaked: सलमान खानच्या ‘सिकंदर’ला मोठा फटका; एचडीमध्ये चित्रपट लीक
… तर अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे – संजय राऊत
मोदींचा स्वभाव पाहता ते फक्त सत्तेसाठीच एखाद्याशी जुळवून घेऊ शकतात, संजय राऊत यांची टीका
राज ठाकरेंना कळकळीचं आवाहन, तर अजितदादांकडे राजीनाम्याची मागणी; संजय राऊत यांची टोलेबाजी काय?