फाळणीनंतर प्रथमच पाकिस्तानचे सरकारी जहाज बांगलादेशात
बांगलादेशची फाळणी 1971 मध्ये झाली होती तेव्हापासून प्रथमच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अधिकृतपणे व्यापार सुरू झाला आहे. 1971 नंतर प्रथमच बांगलादेशात पाकिस्तानचे सरकारी जहाज जात आहे. पाकिस्तानने ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानच्या माध्यमातून 50 हजार टन तांदूळ बांगलादेशला निर्यात करण्याचा करार केला असून दोन टप्प्यांत तांदळाची खेप पाठवली जात आहे.
25 हजार टनांची पहिली खेप बांगलादेशात रवाना झाली, तर दुसरी खेप मार्च महिन्याच्या सुरुवातीला पाठवली जाईल. प्रथमच सरकारी मान्यतेने पाकिस्तान नॅशनल शिपिंग कॉर्पोरेशनचे एक जहाज बांगलादेशच्या बंदरावर पोहोचेल. गतवर्षी पाकिस्तानातील खासगी कंपनीचे जहाज बांगलादेशात गेले होते. मात्र हे सरकारी करारानुसार नव्हते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List