पीक विमा योजनेत गैरप्रकार; कोकाटेंची कबुली
बोगस शेतकऱयांची नावे दाखवून विम्याची रक्कम परस्पर अन्य खात्यात वळवणे, चुकीचे पंचनामे, शेतकऱ्यांचा आधारकार्ड क्रमांक घेऊन बोगस विमा उतरवणे अशा पद्धतीने बोगस प्रकरणांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात चेतन तुपे व अन्य सदस्यांनी शेतकरी नुकसानभरपाईबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात पीक विमा योजनेत गैरप्रकार झाल्याचे अंशतः खरे असल्याचे कृषिमंत्र्यांनी मान्य केले. पीक विमा उतरवण्याच्या संदर्भात निदर्शनास आलेल्या अयोग्य बाबींची तपासणी करून 2024 च्या खरीप हंगामात 4 लाख 45 हजार अयोग्य विमा प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List