पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलायला हवी होती, मात्र तसं झालं नाही; सर्वपक्षीय बैठकीत खर्गे यांनी मांडला मुद्दा

पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलायला हवी होती, मात्र तसं झालं नाही; सर्वपक्षीय बैठकीत खर्गे यांनी मांडला मुद्दा

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. याचदरम्यान, केंद्र सरकारने आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली ज्यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलायला हवी होती, मात्र तसं झालं नाही, असा मुद्दा मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडला. ज्यावर सर्व पक्ष प्रतिनिधींनी या मुद्द्यावर सहमती दर्शवली, अशी माहिती खर्गे यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.

या बैठकीनंतर X वर पोस्ट करत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “पंतप्रधानांनी इतक्या महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे, कारण ते जो काही निर्णय घेतील तो अंतिम असेल. परंतु पंतप्रधान या बैठकीत उपस्थित नव्हते. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत पहलगाममध्ये त्रिस्तरीय सुरक्षा असूनही, सुरक्षेत त्रुटी कशा निर्माण झाल्या ज्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव गमवावा लागला, यावर सखोल चर्चा झाली. गेल्या तीन दिवसांत एक हजार पर्यटकांनी पहलगामला भेट दिली आहे, अशा परिस्थितीत पोलिसांना याची जाणीव असायला हवी होती आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करायला हवी होती. जम्मू-काश्मीरची सुरक्षा आणखी कशी मजबूत करता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पूरन सिंह निघाला मनीर हुसैन, वैष्णो देवी मार्गावर खोट्या कागदपत्रांसह खेचर सेवा देणाऱ्या दोघांना अटक पूरन सिंह निघाला मनीर हुसैन, वैष्णो देवी मार्गावर खोट्या कागदपत्रांसह खेचर सेवा देणाऱ्या दोघांना अटक
जम्मू-कश्मीरमधील रियासी जिल्ह्यात श्री माता वैष्णो देवी मार्गावर खोट्या कागदपत्रांचा वापर करून खेचर सेवा (पोनी सेवा) देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 25 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
लष्कराच्या जमिनीवर बेकायदा बांधकामे कशी? हायकोर्टाचा कल्याण-डोंबिवली महापालिकेला सवाल
3699 गृहनिर्माण प्रकल्पांना खरंच भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे का? महारेरा संबंधित प्राधिकरणाकडून सत्यता तपासून घेणार
बिहारसाठी 13,500 कोटींच्या योजनांची पंतप्रधानांकडून घोषणा, विधानसभा निवडणुकीवर डोळा
पावभाजी केंद्र रात्री 10 नंतर बंद करण्याची नोटीस पुणे पोलिसांना भोवणार; हायकोर्टाने पोलिसांना धाडली नोटीस, प्रतिज्ञापत्रावर मागितला खुलासा
खड्डय़ात साचलेल्या पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू