Jammu & Kashmir – दहशतवादी हल्ल्यातील मृतांना मुकेश अंबानी यांनी वाहिली श्रद्धांजली, जखमींना मोफत उपचार देणार

Jammu & Kashmir – दहशतवादी हल्ल्यातील मृतांना मुकेश अंबानी यांनी वाहिली श्रद्धांजली, जखमींना मोफत उपचार देणार

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या मृत पर्यटकांना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुकेश अंबानी यांनी एक निवेदन जारी करत मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले मुकेश अंबानी?

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप हिंदुस्थानींच्या मृत्युप्रकरणी रिलायन्स कुटुंबातील सर्वजण शोकात सहभागी आहेत. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. हल्ल्यात जखमी झालेले नागरिकांच्या आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तसेच मुंबईतील आमचे रिलायन्स फाउंडेशन सर एचएन हॉस्पिटल सर्व जखमींना मोफत उपचार देईल.

दहशतवादाचे कुणीही समर्थन करू नये. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही माननीय पंतप्रधान, हिंदुस्थान सरकार आणि देशासोबत आहोत, असे मुकेश अंबानी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला ‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला
मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा...
आयबी, एनआयएची टीम डोंबिवलीत दाखल, मोने-जोशी-लेले कुटुंबियांची करणार चौकशी
‘त्यांनी गोळीबार केला, माझा एक हात बाबांच्या डोक्यावर होता अन्…’ संजय लेलेंचा मुलगा भावुक
‘एवढी क्रूरता, हैवान…’, पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी गायक संतापला; 9 वर्षांपूर्वी भारतात आला होता
‘बाप आहे नाना पाटेकर! निर्मात्याला घरी बोलावलं अन् भांडी घासून घेतली’, नेमकं काय झालं होतं?
‘आता युद्ध झालं पाहिजे, माझं रक्त खवळत आहे…’ पहलगाम हल्ल्यावर दिशा पाटनीच्या बहिणीची संतप्त प्रतिक्रिया
लेकाची कृती पाहून संताप; ऋषि कपूर यांनी रणबीरला सर्वांसमोर जोरदार कानशिलात का लगावली होती?