Pahalgam Terror Attack हो चूक झाली! केंद्रीय मंत्र्यांनी दिली कबूली, सर्व पक्षीय बैठकीनंतर केला खुलासा

Pahalgam Terror Attack हो चूक झाली! केंद्रीय मंत्र्यांनी दिली कबूली, सर्व पक्षीय बैठकीनंतर केला खुलासा

जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी पहलगाममध्ये चूक झाल्याचे मान्य केले आहे.

”या बैठकीत आयबी व गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना ही घटना कशी घडली व कुठे चूक झाली ते सांगितलं. जिथे घटना झाली. तिथे पायी किंवा घोड्यावर जावं लागतं. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना ही चूक झाली. या घटनेने सर्व दुखी आहेत. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून काय काय करणार ते सांगितले”, असे रिजीजू म्हणाले.

”राजनाथ सिंह यांनी सीसीएस बैठकीत काय निर्णय घेतले ते सांगितले. दहशतवादा विरोधातील झिरो टॉलरन्स प़ॉलिसीविषयी देखील सांगितले. या प्रकरणी सरकार कडक कारवाई करणार आहे. गेल्या काही वर्षापासून कश्मीरमध्ये सर्व काही शांततेत सुरू होते. सर्व काही चांगले सुरू होते. मात्र या घटनेने वातावरण खराब केलं आहे. त्यावर सर्वांनी चिंता व्यक्त केली. सर्वांनी आपलं मत ठेवलं. देशाला एकजूट आणि एकत्र उभं राहून दहशतवादाविरोधात लढायला हवे. त्यानंतर सर्व पक्षांनी दहशतवादाविरोधात सरकारसोबत आहोत. देश उभा आहे हा संदेश सर्व पक्षांनी दिला आहे. सरकार जे काही पाऊल उचलेल त्याला साथ देऊ असेही सांगितले. एक दुसऱ्या विरोधात राजकारण न करता एकत्र राहू असा संदेश सर्व पक्षांनी दिला आहे, असेही रिजीजू यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान सज्ज; हवाई दलाकडून युद्धसराव सुरु पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान सज्ज; हवाई दलाकडून युद्धसराव सुरु
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने कठोर पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने हवाई दलाने गुरुवारी...
पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलायला हवी होती, मात्र तसं झालं नाही; सर्वपक्षीय बैठकीत खर्गे यांनी मांडला मुद्दा
IPL 2025 – घरच्या मैदानावर ‘जोश’ दिसला अन् RCB चा ‘विराट’ विजय, राजस्थानचा केला पराभव
Pahalgam Terror Attack : त्या एक दोन तासात काय घडलं? हर्षल लेले यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
YMCA ची 150 वर्षे पूर्ण, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन थाटामाटात साजरा होणार
Pahalgam Terror Attack हो चूक झाली! केंद्रीय मंत्र्यांनी दिली कबूली, सर्व पक्षीय बैठकीनंतर केला खुलासा
सात वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरून आईच्या हातून निसटलं आणि सात महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत