सावधान…उन्हाचा तडाखा वाढणार; हवामान खात्याचा अलर्ट

सावधान…उन्हाचा तडाखा वाढणार; हवामान खात्याचा अलर्ट

राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला. उष्णतेच्या लाटेने अंगाची लाही लाही होणार आहे. या काळात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात उष्णतेचा प्रकोप वाढणार आहे. राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उन्हाचा तडाखा वाढणार असल्याने हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

राज्यात विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. चंद्रपूरमध्ये तापमान 45.8 अंशांवर पोहचले. तर अकोला, अमरावती, नागपूर आणि ब्रह्मपूरी या शहरांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केला आहे. पश्चिम विदर्भासह पूर्व भागातील अनेक शहरांमध्ये उष्णतेचा पारा वाढणार आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात तापमानात वाढ होणार आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीतील नागरिकांना सुद्धा उष्ण लाटेचा सामना करावा लागणार आहे. तसेच मुंबई आणि परिसरात उष्णतेसह उकाडाही सहन करावा लागणार आहे.

हवामान खात्याने गुरवारापासून 29 एप्रिलपर्यत देशातील अनेक भागांना उष्णतेचा अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेशातील अनेक भागाना उन्हाचा तडाखा बसेल. 26 एप्रिलपर्यंत उत्तर प्रदेश, विदर्भ, बिहार, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमधील गंगा मैदानी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेच्या अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 24 आणि 25 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सर्व दहशतवाद्यांना ठार करा,  ‘शूट एट साइट’चे आदेश द्या…मोने, जोशी, लेले कुटुंबियांची मागणी सर्व दहशतवाद्यांना ठार करा, ‘शूट एट साइट’चे आदेश द्या…मोने, जोशी, लेले कुटुंबियांची मागणी
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यातील सहा जण महाराष्ट्रातील आहेत. डोंबिवली येथील अतुल मोने आणि त्यांचे...
पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण…, पहलगाम हल्ल्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटे जागीच थांबल्या, उल्हासनगरमध्ये काय घडले?
‘तुम अपनी हद मे रहो…’ प्रेग्नंट कियारासमोर पापाराझींनी गर्दी केली; सिद्धार्थ मल्होत्रा भडकला
पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी; म्हणाली “माझंही रक्त खवळतं..”
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार आक्रमक! पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ बद्दल मोठा निर्णय
दहशतवादाविरोधातील अंतिम,निर्णायक लढाई! हल्लेखोर दहशतवादी आणि सूत्रधारांना अद्दल घडवणारच; पंतप्रधान मोदी यांची ग्वाही