दहशतवादाविरोधातील अंतिम,निर्णायक लढाई! हल्लेखोर दहशतवादी आणि सूत्रधारांना अद्दल घडवणारच; पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

दहशतवादाविरोधातील अंतिम,निर्णायक लढाई! हल्लेखोर दहशतवादी आणि सूत्रधारांना अद्दल घडवणारच; पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मधुमबनीमध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी, त्यांनी व्यासपीठावरून जगाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, हिंदुस्थान कोणत्याही परिस्थितीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता दहशतवादाविरोधातील अंतिम आणि निर्णायक लढाईची वेळ आली आहे. आता दहशचवाद्यांची शिल्ल्क असलेली आश्रयस्थानेही उद्धवस्त करण्याची वेळ आली आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांना आणि त्याच्या सूत्रधारांना आम्ही अद्दल घडवणार आहेत. तसेच त्यांना कोणी विचारही करू शकणार नाही, अशी शिक्षा देण्यात येईल, असा इशाराही मोदी यांनी दिला आहे.

भाषण सुरू करण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. हा हल्ला केवळ नि:शस्त्र पर्यटकांवर नव्हता, तर देशाच्या शत्रूंनी देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. आता दहशतवाद्यांची शिल्लक असलेली आश्रयस्थाने उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे. आम्ही दहशतवाद्यांना पाताळातूनही शोधून काढू आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करू, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेणार नाही. हिंदुस्थानचे शत्रू कुठेही असले तरी, ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही लपले तरी त्यांना शोधून काढले जाईल आणि अद्दल घडवण्यात येईल.

या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. हिंदुस्थानने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी राजदूतांना परत पाठवण्याचा आणि अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या लोकांचे व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आले आहेत. तसेच हिंदुस्थानात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता पंतप्रधान मोदी यांनी आता दहशतवादाविरोधातील अंतिम आणि निर्णायक लढाईची वेळ आली आहे, असे सप्ष्ट करत दहशतवादाचा खात्मा करण्याचा निर्धार जगासमोर व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रभासच्या अभिनेत्रीचे पाकिस्तान सैन्याशी काय कनेक्शन? पहलगाम हल्ल्यानंतर ट्रोल, अखेर मोठा खुलासा प्रभासच्या अभिनेत्रीचे पाकिस्तान सैन्याशी काय कनेक्शन? पहलगाम हल्ल्यानंतर ट्रोल, अखेर मोठा खुलासा
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया...
हे हिंदू-हिंदू काय करताय? पहलगाम हल्ल्यावरून प्रश्न विचारताच भडकले शत्रुघ्न सिन्हा
Mumbai News – एमएमआरडीने मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
सिग्नल लाल असताना जाऊ दिले नाही, नशेबाज कार चालकाने दुचाकीला दिली धडक; दोघे गंभीर जखमी
Jammu & Kashmir – दहशतवादी हल्ल्यातील मृतांना मुकेश अंबानी यांनी वाहिली श्रद्धांजली, जखमींना मोफत उपचार देणार
जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं, मिंध्यांच्या खासदाराचं असवंदेनशील वक्तव्य
Exclusive – आम्ही राष्ट्रभक्त होण्याचा खूप प्रयत्न केला, पण दहशतवादी कुठून तरी येतात आणि आमच्या इज्जतीचा कचरा करून जातात! कश्मिरींची खंत