लेकाची कृती पाहून संताप; ऋषि कपूर यांनी रणबीरला सर्वांसमोर जोरदार कानशिलात का लगावली होती?

लेकाची कृती पाहून संताप; ऋषि कपूर यांनी रणबीरला सर्वांसमोर जोरदार कानशिलात का लगावली होती?

बॉलिवूडमध्ये घराणेशाही म्हटलं की सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे कपूर कुटुंबाचं. त्यात कपूर कुटुंबातील अभिनेते ऋषी कपूर हे कायम चर्चेत असायचे ते त्यांच्या कडक स्वभावामुळे. त्यांचे ट्वीट असतील किंवा मग त्याचे कौटुंबिक वाद असतील. त्यांचे किस्से हे नेहमीच चर्चेत असायचे. ऋषी कपूर यांना पटकन राग यायचा असंही बऱ्याचदा म्हटलं जायचं.

ऋषी कपूर यांनी रणबीरला कानशिलात का लगावली होती? 

पण त्यांनी याच रागात मुलगा रणबीर कपूरला जोरदार कानशिलात लगावली होती. रणबीरने अशी काहीतरी कृती केली होती की ती त्यांना सहन झाली नाही. म्हणून त्यांनी रणबीरला मारलं होतं. रणबीरने स्वत: हा किस्सा सांगितला आहे.

काही कौटुंबीक वादाचे प्रसंग सोडले तर रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्याशी खूप चांगले संबंध होते असं म्हटलं जायचं. ऋषी कपूर यांच्या अनेक आठवणी आणि किस्से आजही चर्चेत असतात. असाच एक किस्सा जो रणबीरने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता. खरं तर एकदा रणबीर बूट घालून देवघरात आला तेव्हा ऋषी कपूर यांना प्रचंड राग आला होता.

रणबीरची ही कृती ऋषी कपूर यांना अजिबात आवडली नव्हती 

एका मुलाखतीदरम्यान रणबीरने हा प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “मी नेहमीच माझ्या वडिलांचा चाहता राहिलो आहे. मला त्यांचे वेगवेगळे पात्र पहायला आवडतं. जरी माझे वडील कधीही माझ्यावर ओरडले नाहीत,तरी त्यांनी मी लहान असताना एकदा मला खूप जोरात कानशिलात लगावली होती. कारण मी पुजाघरात थेट बूट घालून गेलो होतो. तेव्हा मी सुमारे 12 वर्षांचा होतो.” त्यामुळे ऋषी संतापले आणि त्यांनी राग काढताना रणबीरवर हार उगारला. दरम्यान वडिलांच्या अशा अनेक आठवणी आहेत ज्याबद्दल रणबीर नेहमीच सांगत असतो.

रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास…

आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत रणबीरने ‘बर्फी’, ‘संजू’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘तू झुठी में मक्कर’, ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन’, ‘ॲनिमल’, रॉकस्टार, आणि ‘राजनीती’ सारखे अनेक हीट चित्रपट दिले आहेत. आता रणबीर 1 हजार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनत असलेल्या ‘रामायण’ चित्रपटात भगवान श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांनाही या चित्रपटाची तेवढीच उत्सुकता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pahalgam Terror Attack : त्या एक दोन तासात काय घडलं? हर्षल लेले यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार Pahalgam Terror Attack : त्या एक दोन तासात काय घडलं? हर्षल लेले यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे....
YMCA ची 150 वर्षे पूर्ण, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन थाटामाटात साजरा होणार
Pahalgam Terror Attack हो चूक झाली! केंद्रीय मंत्र्यांनी दिली कबूली, सर्व पक्षीय बैठकीनंतर केला खुलासा
सात वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरून आईच्या हातून निसटलं आणि सात महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्यात सापडले पांढऱ्या रंगाचे बिबट्याचे पिल्लू
Pahalgam Attack – सरकारच्या प्रत्येक अ‍ॅक्शनला आमचं समर्थन, सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधी यांचं वक्तव्य
दुसऱ्या वॉर्डमध्ये नेताना लिफ्ट बंद पडली, महिला रुग्णाचा गुदमरून मृत्यू